नात्यात मी पणा सोडून “त्र’यस्थाला आपल्यामध्ये सामावून घेणारे सूत्र म्हणजे मित्र होय.
उपर्याला ही आपलं म्हणणारं गोत्र असतं, आणि अपरिचितातील चिरपरिचिता मधील, चिरपरिचित चित्र असतं.
मित्र म्हणजे मिश्कील हास्य असतं आपुलकीचं दास्य असतं.
डोळ्यामधील अश्रु टिपणारं मखमली वस्त्र असतं.
हे तुझे , हे माझे असा दूजाभाव न ठेवणाारं क्षेत्र असतं.
मित्रामध्ये हृदयातील भावना असतात आणि असे हे भावनापूर्ण हृदय म्हणजे मित्र असतो.
मित्र हे सत्यातलं स्वप्न असतं आणि स्वप्नातल्या स्वप्नामधलं मधूर सत्यही तेच असतं.
आपल्या तब्बेती कां बिघडतात ?
मनांत खूप साचलं की कुणाजवळ तरी बोला. ऐकणार्याचा खांदा होवू द्या की ओला .
धरण पूर्ण भरल्यावर दरवाजे उघडतात, माणसं तसं वागत नाहीत म्हणून तब्बेती बिघडतात.
येवढ्यासाठी आग्रह आहे. मन मोकळे करा एखाद्या तरी मित्राचा हात हातात धरा.
जे वाटतं ते बोलून टेन्शन करा कमी.
खरं सांगतो व्यक्त करण्यात आरोग्याची हमी, जर कुढत बसलात घरी तर विपरीत परीणाम होणार देही.
ब्लड प्रेशर, शुगर, टेंशन, ॲसिडिटी कमी जास्त होणार वरवरी.
राहू केतू शनी ही त्रास देणाारी नाती, ग्रहांना दोष देवू नका आपलेच ‘ते’ त्रास देती सदा.
तोंड दाबून बुक्क्यांचा मारं सहन करावा लागतो, जणु याच साठी असतो मनुष्य जन्म.
दु:ख सांगायला कोणी नसणे ही जागतीक समस्या जाणा.
अनेक रोगांचे कारण हे कुढत बसणे जाणा.
रडायला जर जागा नसेल तर लावा प्रॉपर्टीला काडी,
काय करायचं सोनं-चांदी, बंगला- गाडी.
हजार वेळा सांगितलं माणसं जोडायला शिका,
तुला वाटलं करील पैसा सर्व ठिक, जे होईल ते होईल म्हणून झुगारुन टाका भिती.
प्रत्येक क्षण जगून घ्या, नका म्हणू उरले किती.
आयुष्यात एखादा तरी मित्र असावा सोबती.
1 Comment
सौ. शीला केतकर
खरंच आहे
मैत्री करताना मी पणा सोडावा लागतो तरच मैत्री होते.
आपल्या मनातील गोष्ट आपण घरातल्या जवळ सुद्धा बोलू शकत नाही हीच गोष्ट आपण मित्रा जवळ सहज बोलून जातो आणि आपले मन हलके करतो.
मित्रही आपले मन जाणणारा असतो.
आयुष्यात एक तरी मित्र असावा च. जसा सुदामा आणि कृष्ण👍
🙏 राम कृष्ण हरी🙏