सद्गुरुंनी जगण्यासाठी दिलेला सुंदर मंत्र, ते म्हणतात –
कितीक सरले कितीक उरले, आयुष्याला मोह नका।
मस्त जगुया आनंदाने, मंत्र मुळी हा सोडू नका।
नाही पटले काही जरीही, उगाच क्रोधीत होवू नका।
व्यक्ती तितक्या विचार धारा, मंत्र मुळी हा सोडू नका।
योग्य अयोग्य, चूक बरोबर, मोज माप हे लावू नका।
विवेक बुद्धी प्रत्येकाला, मंत्र मूळी हा सोडू नका।
सुख दु:ख हे पुण्य पाप ते, देैव भोग ते तावू नका।
कर्म फळाच्या सिद्धांचाचा, मंत्र मूळी ही सोडू नका।
खाण्या बाबत दृष्टी अग्रही, कधी कुठेही राहू नका।
खावू मोजके, राहू निरोगी, मंत्र मूळी हा सोडू नका।
मत आपले, विचार, सल्ला विचारण्याविण देऊ नका।
मान आपला आपण राखा, मंत्र मुळी हा सोडू नका।
नाही बोलले कुणी तरीही, वाईट वाटून घेऊ नका।
जगलो केवळ दुसर्यासाठी, कुठेच आता गुंतू नका।
फक्त जगु या आपल्यासाठी, मंत्र मुळी हा सोडू नका।
जाणा कारण या जन्माचे, वेळ व्यर्थ हा चालू नका।
वेळ व्यर्थ हा घावू नका, मंत्र मुळी हा सोडू नका।
श्वासानंतर नाम सुटावे, मंत्र मूळी हा सोडू नका।
याप्रमाणे आयुष्य जगताना काय करावे व काय करु नये याचेू मार्गदर्शन सद्गुरुंनी येथे केले आहे. तो मंत्र आपण सोडू नये.