माणसाची जीवन त्याच्या शरीर, मन व आत्मा या तीन चाकाच्या गाडीवर चालू असते.
मनाने चिंतन करावयाचे आत्म्यावर ते चिंतन ठसवायचे व आत्मा देईल त्या आज्ञेने जीवन जगायचे ही जिवन जगण्याची खरी पद्धत आहे.
आपण मात्र जीवनात शरीर, मन व आत्मा एकच समजून चालतो. हे माझे शरीर, हे माझे घर, हा माझा पैसा, असे समजत आपण जीवन जगत असतो. तेथे आपण फसतो.
आत्मा जो पर्यंत शरीरात आहे तोपर्यंत आपणाला किंमत आहे. पण एकदा का तो आत्मा शरीरातून निघून गेला की शरीराचे प्रेत होते व त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावली जाते.
आत्म्या प्रमाणे मन पण शरीराची साथ सोडते ‘मी’ माझे म्हणणार्या एक पण गोष्टी सोबती बरोबर येत नाहीत. आत्मा मात्र या शरीराची साथ सोडून दुसरे घर घरतो. शरीराची विल्हेवाट कुटुंबीय, नातेवाईक, सर्व मिळून करतात.
सुख देणारे सर्व मार्ग दु:ख देत असतात. आत्मा मात्र आपली गरज संपली हे जाणून त्या घराचा त्याग करतो व नवीन घरांत पदार्पण करतो.
मन व शरीर हे जीवनाचे दोन प्रवासी आहेत. शरीर त्यांना प्रवास करणेसाठी साधन आहे. आत्मा व मन सांगेल त्या पद्धतीने चालायचे हा शरीराचा गुण आहे. तेव्हा प्रपंचाची गाडी व्यवस्थित चालावी, प्रपंचात शाश्वत सुख प्राप्त व्हावे यासाठी आत्मा व मन यांचे संतुलन व शरीराची वाटचाल संतुलीत ठेवली पाहिजे.
जो प्रापंचिक आत्मा, मन व शरीर या तिघांची व्यवस्थित मोट बांधतो, तो जीवनात माणसाने कसे जीवन जगावे हे दाखवू शकतो.
याप्रमाणे माणसाने शरीर, मन व आत्मा या तिघांची मोट बांधून त्यांचे संतुलन राखत जगणे, हीच खरी जीवन जगण्याची रीत होय.
1 Comment
सो. शिला केतकर
👌 आत्मा आहे म्हणून शरीराला किंमत आहे
आत्मा निघून गेला की मन पण बाहेर पडते आणि शरीराची विल्हेवाट हे अगदी सत्य
या तिघांचे संतुलन साधणे महत्वाचे आहे
एखाद्या योग्य माणसाला जमु शकेल
राम कृष्ण हरी🙏