मला एकाने प्रश्न विचारला, मन म्हणजे काय हो?
मी म्हणालो, त्याला कोणी पाहिलं नाही. कसं असतं ते माहीत नाही. पण त्याला खूप मानसन्मान असतो.
असं ते मन असतं.
ते निरनिराळ्या अवस्थामध्ये फिरत असतं, कधी तरल असतं तेव्हा आपण त्याला मन भरलं नाही असे म्हणतो.
ज्यावेळी ते दगडासारखे कणखर होते, तेव्हा त्याच्यावर खूप ओझं आहे असे वाटते.
कधी ते घराच्या रुपात कुणाचे तरी मनांत घर करुन रहाते. कधी प्रेमिका मध्ये जावून म्हणते, मेरा मन तेरा प्यासा, कधी ते मन मोराचा पिसारा बनते व आपला पिसारा फुलविते.
असे हे मन कधी स्वत:च्या तर कधी दुसर्याच्या मनाप्रमाणे वागत असते.
मन हे फार अस्थिर आहे. ते एकेठिकाणी कधी स्थिर होत नाही. तेव्हा माणसं म्हणतात. त्याच्या मनांत कांही रहात नाही.
कांहीजण मात्र दुसर्याच्या मनांत काय चालले आहे हे जाणतात. तेथे मनाला मनकवडे म्हणतात.
असं हे मन कधी दिसत नाही.
पण या न दिसणार्या मनाने ठरविले तर ते हरवून टाकतं. तर कधी शक्ति नसताना जिंकून ही देतं.
मनांत आणलं तर काहीही होऊ शकते. जरी त्याला कोणी पाहिलेल नाही तरी ते जर चांगलं असलं तर आपण आनंदी राहतो.
मनाने घेतलं तर ते दुसर्याचं भलं करतो.
म्हणूनच म्हणतात मन चंगा तो कठौती में गंगा.
तसं पाहिलं तर मन हे खुप डेंजर असतं. ते स्वत:कडे राग, तिरस्कार साठवून ठेवते आणि मनातील राग दुसर्याचं नुकसान करतंं.
अशा या मनाच्या वेगाचा वेग मोजण्याचे यंत्र अजुन सापडले नाही. तरीपण त्याच्या वेगावर नियंत्रण हवे, ब्रेक हवा असे सर्वांना वाटत असते.
मन दिसत नसलं तरी ते आपणाला जगभर फिरवतं असतं. कधी घरी, कधी डोंगर दर्यात, कधी आकाशात.
अशा या मनाला काबुत ठेवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात.
पण खर सांगु मनाप्रमाणे जगता आले नाही तर त्याला काही अर्थ आहे काय? मनसोक्त जगा.
1 Comment
Jitendra porwal
Excellent…