मनाची अवस्था कशी असते हे या पंक्तीत दर्शविली आहे.
वडाळ वडाळ म्हणजे खोडकर.
हे मन बालीश आहे, खोडकर आहे अवखळ आहे या मनाला जशी संगत मिळेल तसे ते वहात जाते.
काहीजण म्हणतात, देवपूजेने मन प्रसन्न होते व सर्वसिद्धी प्राप्त होतात. कांहीजण मनाला पाण्याची उपमा देतात. जसे आपण म्हणतो, अजुन पाण्याची घागर भरली नाही. अद्याप मन भरले नाही, मन स्थिर झाले नाही. कोणी फुटक्या घागरीने पाणी कसे भरणार, अशी विचारणा करतात. तेथे मनाची मजबूती दाखवली जाते.
अस्थिर मन इच्छित कार्य कसे करु शकेल हे दाखविले आहे. काही जण मन हे अतिशय कठीण असल्याचे दाखवितात. कोणत्याही प्रसंगात ते स्थिर रहाते. याच मनाला कांहीजण घराची उपमा देतात. माझ्या मनात (घरात) स्मरणात रहाणारी व्यक्ती कांही वेळा मनाला तहान लागते, तेव्हा पाण्यासाठी ते सर्वच सैराट होवून पळते. आपली प्यासी प्रवृत्ती ते दाखविते. तर काहीजण मेरा मन तेरा प्यासा म्हणून आसक्ती व्यक्त करतात.
कोणी निसर्गातील मोराची उपमा मनाला देतात. माझे मन मोराच्या पिसार्यासारखे कसे पिसारा पसरुन आनंदी जीवन जगत आहे असे दाखवितात.
अशा अनेक प्रकाराने मन आपणास जीवनांत झुलवत ठेवते. आयुष्यात कधी स्वत:च्या तर कधी दुसर्याच्या मनाप्रमाणे आपण वागत असतो. हेे मन कधीच स्थिर रहात नाही.
तारुण्यात प्रेयसीच्या रुपाने, ते मंदीर बनते, तर प्रेयसी त्याला त्याच मंदीरात देव बनवून बसविते.
कांहीजण मनाला महत्व देत नाहीत. त्यांना इतरांचे मनांत काय चालले आहे, हे समजतेे. त्यामुळे त्यांना मनकवडे म्हणतात. असे हे अदृष्य मन मनांत आले तर जग जिंकू शकते.
मनाने ठरविले तर कांहीही होवू शकते. त्याला आपण पाहू शकत नाही. पण ते चांगल्या संगतीत असेल तर जीवन आनंदी बनवू शकते.
त्यामुुळेच म्हटले आहे, मन चंगा तो कठौती मे गंगा ।
मनामध्ये धोकादायक, राग द्वेष, मत्सर यांचे साठे साठवून ठेवलेले असतात. ते केव्हा स्फोट घडवून आणतील हे सांगता येत नाही.
तेव्हा इतरांची हानी करणारे मनांतील साठे आपण योगाचे सहाय्याने दूर करावेत.
अशा या मनाला वेगाने पळण्याची सवय आहे, म्हणून त्याला मनाचा ब्रेक लावणे गरजेचे असते.
हेच अदृष्य मन घेवून आयुष्यात कधी घरी, कधी डोंगर दर्यात, कधी आसमंतात फिरत असते.
प्रापंचिक लोक या मनाला काबूत ठेवण्याचा खोटा प्रयत्न करतात. तो प्रयत्न निष्फळ होतो.
तेव्हा अशा या खोडसाळ मनासोबत मनसोक्त जगा. त्याचेवर प्रभुत्व मिळवा व आनंदी जीवन जगा.
मग तुमच्या मनांत येईल मन वडाळ वडाळ नाही तर तुमचे मन चंगा तो कठौती में गंगा.
1 Comment
drsameerbhandari@gmail.com
आत्मचिंतन आतून आत्म समृद्धीकडे हा ब्लॉग वाचला फारच छान लिखाण आहे
मानव वढाळ आहे
मन चंचल आहे
मनाला काबूत आणणे फार अवघड आहे
रामदास स्वामींनी तर मनाचे सगळे श्लोक त्यालाच उद्देशून गेले आहेत
हे मन काबूत आणण्यासाठी योगा करा मनाची एकाग्रता वाढवा अगदी योग्य आहे
चित्तवृत्ती ला लगाम घालवणे अवघड आहे
आणि ज्यांना हे जमले तो निश्चितच मनाने समृद्ध होतो
आत्मचिंतन आणि आत्म समृद्धी या लेखाचे नावही आवडले छान👌