मैत्री

मित्र, मैत्रिण, मैत्री असे शब्द आपण अनेक वेळा वापरतो. त्या शब्दातून विविध अर्थ समोर येतात. ही मोठी मनोरंजक बाब आहे.

तेव्हा प्रथम मैत्री ही काय बाब आहे याचा आपण विचार करु.

मैत्री ही एक भावना आहे, ही एक सुख संवेदना आहे. दोघांमधील आकर्षण – साम्य आहे. मैत्री हा एक भावनात्मक समझोता आहे. ही मैत्री शत्रु-मित्रातून होऊ शकते. प्रेमाने होऊ शकते. काही वेळा दुष्ट हेतुने पण अशी मैत्री केली जाते.

त्या मैत्रीला त्यामध्ये असलेल्या भावाप्रमाणे स्वरुप दिले जाते.

बालवयांत बालकाची आईशी मैत्री असते. त्याच्यासाठी ती कुठूनपण धावत येते.

मोठेपणी अनेक सवंगडी भेटतात, त्यांचे आचार-विचार पटले तर त्यांच्याशी आपली मैत्री होते. पण ही मैत्री स्वार्थी तात्पुरती असते. त्यांचे सानिध्य संपले की ती मैत्री विसरुन जातात.

तेव्हा मैत्री हा भाव आहे.

मानवता हा त्या मैत्रीचा भाव आहे. ज्या दोन व्यक्तीमध्ये, दोन प्राण्यांमध्ये , माणुस व प्राण्यांमध्ये, दोन पक्षामध्ये, दोन नेत्यांमध्ये, दोन राजांमध्ये हा भाव उमटतो तेथे सद्भाव उत्पन्न होतो, मैत्री निर्माण होते. दोघांचे मध्ये प्रेमाचा तह होतो. आयुष्यभर तो टिकविण्याचा प्रयत्न होतो.

घार फिरते आकाशी परी लक्ष असते पिलापाशी. या उक्तीतून मैत्रीचा भाव दिसून येतो.

आपण मानव आहोत. सर्वांभूति परमेश्‍वर आहे ही भावना आपल्या मनांत आहे. तेव्हा सर्वांचे सुखदु:खामध्ये आपण सहभागी होवो अशी भावना ज्यावेळी तयार होते, तेथे मैत्री जन्म घेते.

ही मैत्री ज्यावेळी निसर्गात दिसते, मानव निसर्गाची, झाडांची तोड थांबवतो, पर्यावरण सांभाळतो तेव्हा ती खरी मानव व सृष्टीची मैत्री होते.

तसेच माणसा-माणसातील प्रेम जेव्हा वाढू लागत तेव्हा मानवतावाद जन्म घेते.

Leave a comment