पंचमहाभूतांतील तेज या तत्वात क्रोधाची उत्पत्ती होते. हा अग्नीप्रदान दोष आहे. तो महाभयंकर विनाश घडवून आणणारा आहे. याच्यावर ताबा मिळविणे मोठे कठीण काम आहे.
विवेकी माणूस चिंतनाने – विचाराने त्यावर चिंतन करतो. तो क्रोधाला काडीपेटीत ठेवतो. जशी जरुर पडेल तशी त्या काडीपेटीचा वापर करतो.
म्हणजे देवा समोर दिवा लावण्यासाठी तो आनंदाने काडी शिलगावतो तर गवताची गंजी त्याच काडीने पेटवून सर्व चार्याची राख रांगोळी करतो.
तेव्हा या क्रोधावर ताबा मनुष्य जन्मात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
प्रेशर कुकरची शिट्टी वाजु लागली की विवेकाने आपण त्याचा क्रोध वाढू नये म्हणून गॅसचे बटण बंद करतो व धोका टाळतो.
त्याप्रमाणे प्रपंचात टोकाचे भांडण झाले तर त्यावेळी सामंजस्याने माघार घेणे ही क्रोधावर मात करण्याची कला आहे.
क्रोध ज्यावेळी मस्तकातून बाहेर पडतो, त्यावेळी भूकंप होतो व शरीरातील अनेक अवयव निपचित होवून जातात.
ज्यावेळी क्रोध तोंडातून बाहेर पडतो. त्यावेळी त्याची वाचा जाते, त्याला नीट बोलता येत नाही.
ज्यावेळी क्रोध डोळ्यातून बाहेर पडतो, तेव्हा त्याचा डोळ्यावरील ताबा निघन जातो.
ज्यावेळी हा क्रोध हात, पाय यातून बाहेर पडतो. त्यावेळी त्याला लुळेपणा जाणवितो.
तेव्हा या क्रोधाची भयानता लक्षात घेवून तो आपल्या ठिकाणी कसा बंदिस्त ठेवायचा ही कला माणसाने शिकणे गरजेचे आहे.
2 Comments
Mithun
True
शीला केतकर
क्रोध एव महा शत्रु असे क्रोधाला म्हटले आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे क्रोध विनाश घडवतो हेही सत्य आहे. मराठीत एक म्हण आहे अति रागावणे म्हणजे मसणात जाणे
म्हणजे क्रोध हा विनाशाकडे नेतोच म्हणून माणसाने क्रोध टाळावा. आणि क्रोधाला समोरच्या माणसाने शांततेने जिंकावे असे एक संस्कृत वचन आहे
क्रोधावर ताबा मिळवणे अवघड आहे आणि तो फक्त नामस्मरणाने किंवा ध्यानधारणेने थोडाफार होऊ शकेल
इतके शांत राहिला आपण एकनाथ महाराज होऊ शकत नाही पण प्रयत्न करायचा आपण क्रोधावर फारच छान दिले आहेत🙏 राम कृष्ण हरी🙏