काही प्रश्न जीवनात अनुत्तरीत येतात. त्यातला हा एक प्रश्न आहे – कोण आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार?
प्रत्येकाचे जीवन हे नर्मदेतील गोट्याप्रमाणे असते त्याला आकार देणे, त्यातून सुंदर प्रतिकृती निर्माण करणे हे एक शिल्पकाराचे काम असते. अशी अनेक अनेक शिल्पे मी माझ्या जीवनांत पाहिली, मन तृप्त झाले. पण विचार तृप्त होत नव्हते. विचारांती एकत्र प्रश्न समोर उभा राही कोण आहे याचा शिल्पकार.
जसे निरनिराळे पुतळे, स्मारके पहात गेलो तसे अनेक शिल्पकार पण समोर आले. निर्जीव दगडातून सजिव वाटणारी शिल्प निर्माण करणार्या शिल्पकारांना मी अभिवादन केले. तेथे मनांत प्रश्न उभा राहिला, तो सजीवामधील मानवतेचे शिल्प साकारणारा कोण आहे ?
तेथे मला जगद्गुरु वामनराव पै यांचे स्मरण झाले. त्यांची वाणी कानांत घुमली, त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.
मानवी जीवनाचे, मानवतेचे शिल्प हे दुसर्या कोणी साकारायचे नसते, ते प्रत्येकाने आपल्या मनांत पतिबिंबीत करावयाचे असते व त्या प्रतिबिंबामध्ये आवडीचे रंग भरावयाचे असतात.
तेव्हा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या मागे “तू” ची ओळख महत्वाची आहे. तुम्ही कोण आहात, कशासाठी आला आहात, काय करण्याचा निर्धार तुम्ही केला आहे. परीश्रमाची तयारी आहे का? या सर्व गोष्टी ओळखणे म्हणजे “तू” ची ओळख करुन घेणे.
तेथे इतरांचा विचार नाही सर्व कांही करावयाचे आहे ते तुलाच करावयाचे आहे, ही भावना दृढ करणे होय.
जीवन हे वाहत्या प्रवाहाच्या नदीप्रमाणे असते. त्या नदीवर कोणी बंधारे घालतात, धरणे बांधतात, पाणी आडवितात व नापिक जमिनी सुपीक करतात, सुजलाम सुफलाम करुन सोडतात. तेथे नदीच्या पाण्याचे नियोजन करणारा अभियांत्रिक असतो.
मात्र तुमच्या जीवनाला सुजलाम-सुफलाम करण्याचे कार्य हे इतरांचे नाही. त्यांचे मनांत द्वेष, राग, लोभ असतात.तेव्हा या कामासाठी तुम्ही स्वत:लाच प्रवृत्त करा. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे ध्यानात घ्या.
तुमची नजर बदला, तुमचा दृष्टीकोन बदला, तुमचे आयुष्य बदलून जाईल. दूसर्यांवर विसंबून राहू नका. जो दूसर्यावरी विसंबीला त्याचा कार्यभार संपला. खरचं, परिश्रम, जिद्द, विश्वास यांचे बळावर माणूस कुठपर्यंत पोहचू शकतो याची प्रचिती अनेक साधू संत, राजकारणी, समाजसेवक, वैद्यकिय व्यवसाईक यांचेकडे पहाताना लक्षात येते. तेथे उत्तर मिळते.
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
स्वत:च्या मनगटावर विश्वास असणार्यांना दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा कधीच करत नाही.
बटाटा वड्याचे अप्रतिम वर्णन
फक्त तुझ्या गंधाने मम मोह अनावर होते..
रसनेचा लगाम सुटतो मी सहज ओढला जातो..
पाहुनी पिवळी तव कांती, मी अति भुकेला होतो..
हातात यायच्या आधी, नजरेने खाऊन घेतो..
मग पाव पांघरुणी वरती लसणाची चटणी भुगती..
तळल्या मिरच्यांच्या संगे मी तुजला उचलुनी घेतो..
प्रकृती स्वास्थ्यवाल्यांचा किती विरोध झाला तरीही..
हे प्रेम न माझे घटते, आस्वाद तुझा मी घेतो..