विज्ञान युगात – विज्ञान म्हणजे शोध घेणे. ज्या गोष्टी माहित नाहीत त्याचा शोध घेणे, जो हे काम करतो त्याला वैज्ञानिक म्हणतात.
एखाद्या गोष्टीचा मूळा पर्यंत जाऊन शोध घेणे व आपले मत सांगणे व इतरांनी ती गोष्ट मान्य करणे यामध्ये वैज्ञानिकाची परीक्षा असते, व तो त्या परीक्षेत उत्तीर्ण होतो, त्याला खरा वैज्ञानिक म्हणतात.
तसे पाहिले तर मीठ व पाणी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपणाला त्या नजरेत वेगळ्या दिसतात. पण पाण्यात मीठ टाकले तर मिठाची ओळख विसरली जाते. कुठूनही पाहिले तर तो पाणीच वाटते. पण जो खरा वैज्ञानिक असतो. तो ते पाणी तोंडात घेवून खात्रीने सांगतो या पाण्यात मीठ आहे.
अविवेकी माणूस हे मान्य करीत नाही. देव आहे हे सत्य आहे हे विवेकी माणूस मान्य करतो पण अविवेकी माणूस तो दिसत नाही म्हणून मान्य करीत नाही.
त्याला तो कुठेही दिसत नाही. त्याचे अस्तित्व पहावायाचे असेल तर गुण जेथे दिसतील तेथे शोधावे. ही खरी वैज्ञानिका होय.
एका ज्ञानेद्रयाने खरा वाटणारा अनुभव दुसर्या ज्ञानेद्रयाने खोटा ठरतो ही वैज्ञानिक मुळाशी जावून त्याचा शोध घेतो व अनुमानाने त्या गोष्टीचा शोध लावतो.
यासाठी विज्ञानामध्ये विवेक असणे गरजेचे आहे. ज्या वैज्ञानिका जवळ हा विवेक असतो त्याला खरा वैज्ञानिक म्हणतात.
कोणत्याही शोधाचे मूळापर्यंत जावून विवेक जागृत करुन त्या वस्तुचे परीक्षण करणे व आपला निर्णय सांगणे हे खर्या वैज्ञानिकाचे लक्षण होय.
अशा वैज्ञानिकाची गरज आज आहे. इतर संशोधक फक्त शोध घेतात मत सांगत नाहीत.
आपण खरे वैज्ञानिक होण्याचा प्रयत्न करुया. राजहंसासारखे निर-क्षीर न्यायाने खरी गोष्ट शोधुया हीच खर्या वैज्ञानिकाची ओळख होय.