एखादी गोष्ट घडते त्यामागील कर्माचे कार्य शोधणे याला कार्य कारण भाव म्हणतात.
जीवनात पदोपदी अडचणी येतात. त्यातून आपण सहीसलामत सुटणे अगर त्यामध्ये गुंतणे हा पण एक कार्यकारण भाव समजला जातो व ज्याला या अडचणी सोडविण्याची कला जमली तो खरा जीवन विद्येचा यशस्वी साधक होतो.
तुमचे विचार शुद्ध व श्रेष्ठ असतील तर ते हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. यशस्वी जीवन हे चित्तशुद्धी व हृदयशुद्धी यावर अवलंबून आहे.
जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असे शास्त्र सांगते, कारण ती लाळेच्या ओलाव्यात असते तर जिभेने केलेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असे अनुभवाने कळते.
यावेळी तुम्हाला पहाताच समोरची व्यक्ती नम्र होते. ओळख दाखविते नमस्कार करते. त्यावेळी लक्षात घ्या तुम्ही जगांतील सर्वात मोठी श्रीमंती कमविली आहे. एखादा माणूस आपणाकडून कांही अपेक्षा ठेवतो तेथे त्याचे गरजेपेक्षा त्याचा विश्वास महत्वाचा असतो. त्यामुळे त्याची अडचण खात्रीने दूर होते.
तेव्हा धीर धरी रे धीर धरी मानवा कटु सत्याची फळे गोमटी.
कोणत्याही गोष्टीचा कार्य कारण भाव लक्षात घ्या.