कणगी

पारंपारीक वस्तू आता दिसेनाश्या झाल्या आहेत. त्याची आठवण नवीन पिढीला कशी होणार. ती व्हावी यासाठी आठवणीतल्या साठवणीतून एक वस्तू बाहेर काढली आणि ती वस्तू म्हणजे कणगी.

मी लहान असताना आमचे शेत होते. शेतातून दरवर्षी भरपूर धान्य घरी यायचे. वर्षभरासाठी आपणाला लागणारे धान्य वाळवून धान्याचे किड्यांपासून संरक्षण करण्यासाठी जी पर्यावरण पूरक साठवण करणारी वस्तु म्हणजे कणगी होय.

बाबुं आणि टणटणी, घाणेरीच्या काड्यापासून बलुतेदार कणगी बनवित असत व ते देत असत. कणगीला आतून बाहेरुन शेणाने सारवत व हवाबंद करीत असतं.

सुगी झाली की धान्य उन्हात तापवून रात्रीच्या वेळी थंड करुन ते कणगीमध्ये भरले जाई. साधारण 6 ते 7 फुट उंचीची ही कणगी असे. त्यामध्ये 5 पोती धान्य मावत असे.

याच प्रकाराबरोबर घराच्या भिंतीत कप्पा करुन त्यात धान्य साठवण होत असे.

धान्य काढण्यासाठी खालच्या बाजुने छोटे छिद्र असते. त्यातून धान्य काढले जात असे. अशी ही कणगीची साठवणीची कथा.

जुने ते सोने म्हणतात ना तशी ही कणगी आहे.

जुनी झाली पण तिला भाव सोन्याचा आहे.

प्रपंच करीत असताना प्रपंच्याच्या आठवणी, सुख दु:खाचे प्रसंग , आठवणी कुठे तरी भरुन ठेवायच्या असतात.

त्यासाठी जागा हवी असते.

शेतातील ज्वारी, बाजरी, गहू असे प्रकारचे धान्य निरनिराळ्या कणग्यामध्ये भरुन ठेवतात, त्याप्रमाणे प्रपंचातील सुख-दु:ख, हेवा-दावा, हे पण मनांतील अशा खोलवर असलेल्या कणग्यात ठेवले असते.

वेळ आल्यावर एकएक कणगीतील सुख, दु:ख हेवा, दावा बाहेर काढला जातो.

परमार्थात पण ज्ञान, दर्शन चारित्र्याची जरुर त्या ठिकाणी आठवण ठेवून जीवनाला वळण लावावे लागते.

अशी आहे ही साठवणीतील परि आवरण रहित आठवण कणगी .

जीवन सुखी समाधानी बनवायचे असेल तर कणगीत भरलेले मैत्रीचे आनंदाचे साठे जरुर त्या ठिकाणी खुले करा.

Leave a comment