प्रत्येक धर्माच्या काही शिकवणी असतात. जैन धर्माने पण खूप चांगली शिकवण दिलेली आहे.
जैन धर्म ‘जीओ और जीने दो’ ची शिकवण देतो.
प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. त्याने तो पाळावा. त्याच बरोबर इतरांना जगण्यासाठी मदत करावी. अशी ही मानवतावादी जैन धर्माची शिकवण महत्वाची सांगितली आहे.
भूतदया : मुक्या प्राण्यांना अभय द्या. त्यांची काळजी घ्या. गोशाला काढा, कसायाच्या तावडीतून प्राण्यांची सुटका करा. सर्वांचा आत्मा एकच आहे. तेव्हा मानवता भाव मनांत ठेऊन जगा.
क्षमा : जैन धर्माची दुसरी शिकवण म्हणजे क्षमा वृत्ती. माणसाने नेहमी क्षमाशिल असावे. आपणाकडून एखाद्याला दुखविले गेले तर त्याबद्दल विलंब न करता क्षमा मागावी व इतरांनी आपणाकडे क्षमा याचना केली तर ताबडतोब त्याला क्षमा करावी. त्याच्या चुकीचा परत परत पाढा वाचू नये.
मौन : जैन धर्मामध्ये मौनाला फार महत्व सांगितले आहे. जिव्हेवर ताबा आणा म्हणजे संतुलीत-कमी-बंधन ठेवून आहार घ्या. खाण्यापिण्यावर ताबा ठेवा. तसेच बोलण्यावर पण ताबा ठेवा. त्यामुळे तुमचे कर्मबंधने कमी होतील व तुम्ही शांततेत जगु शकाल.
निर्मोही बना : कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका. आसक्ती ठेवू नका. विषयापासून लांब रहाण्याचा प्रयत्न करा.
ब्रम्हचर्य : पाळण्याचा प्रयत्न करा.
मन, वचन, काया : द्वारे होणारे कळत न कळत कर्म क्षमावृत्तीने धूवून टाकण्याचा प्रयत्न करा. पापांची आलोचना करण्याचा प्रयत्न नित्य नियमाने करा. सामायिक प्रतिक्रमण करा.
गुरुजन, देवगुरु यांची सेवा सृश्रृषा करा. त्यांचा सन्मान करा. गुणगौरव करण्याचे विसरु नका, अशी जैन धर्माची शिकवण आहे.