राम नाम सत्य है । राम नाम सत्य है ।
हे शब्द ऐकून मी गडबडीत खिडकीपाशी आलो व बाहेर पाहिले तर मोठी अंत:यात्रा चालू होती व सर्वजण राम नाम सत्य है म्हणत चालले होते.
मला कांही सुचेना, मी बाहेर आलो व अंत:यात्रेत सामिल झालो. ती अंत:यात्रा गावांतील ऐका आदर्श, श्रीमंत, ऐश्वर्य संपन्न अशा व्यक्तीची होती. त्याचा गावातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात गवगवा होता.
तो जिद्दी होता. श्रीमंती, संपत्ती त्याचे घरी पाणी भरत होती. कोणतीही गोष्ट त्याला अशक्य वाटत नव्हती. एवढेच काय तर कोणी त्याला मृत्यूचे भय दाखविले तर तो स्वता:(त्याच्या) भोवती सुरक्षीतेचे कवच वाढवत असे. त्याला वाटत होते माझी संपत्ती, श्रीमंती मृत्यूला विकत घेईल.
पैशाच्या जीवावर त्याने अनेक शरीर रक्षक, वैद्य, तैनातीला ठेवले होते. प्रत्येक अवयवावर लक्ष ठेवणारे, जरुर पडेल तेथे अवयव दान करणारे पण त्याने खिदमतीस ठेवले होते. त्याचे समोर जगणं हे ध्येय होत. त्या एकाच ध्येयाकडे त्याची वाटचाल चालू होती.
तो पैशामुळे अहंकारी होत गेला. त्याला आपल्या जीवासमोर इतरांचे जीवन जगण्यासाठी तो इतरांचा बळी घेवू लागला.
जस जसे दिवस जात होते. तस तसे त्याचे जीवनमान उंचावत उंचावत गेले. त्याला आकाश ठेंगणे वाटू लागले. या जगात माझ्या इच्छेला मुरड घालणारा कोणी नाही, अशी त्याची समजूत झाली.
तेथे अनाचाराला सुरवात झाली.
आपल्या सुखासाठी तो इतरांना दु:खी करत गेला. गोर गरीबांची पिळवणूक करीत राहिला.
तेथे त्याच्या जगण्याला नजर लागली. त्याच्या अहंकाराला ठेच लागली.
एक दिवस परमेश्वरच त्याचे स्वप्नात येवून सांगून गेला. मृत्यू हेच सत्य आहे. तेव्हा तू जे जगत आहे. त्यात थोडा बदल कर. जीवनाचे सत्य काय आहे ते डोळ्यासमोर ठेव, प्रत्येकाला जगायचे आहे हे ध्यानात ठेव.
स्वत:च्या जगण्यासाठी इतरांना मारु नकोस. इतरांवर अत्याचार करु नकोस.
तू मजेत रहातो आहेस. ही परमेश्वराचा कृपा समज त्याचे तू आभार मान.
पण जीवनाचे सत्य कधी विसरु नकोस मृत्यू म्हणजे रामापाशी जाणे हे सत्य आहे हाच खरा आनंद आहे व त्यासाठी आपण जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येकाला त्या रामाकडेच जायचे आहे. हे सत्य कधी विसरु नये.
असलेल्या संपत्ती, ऐश्वर्य, पैसा याचा गर्व करु नये. ती कोणत्याही परिस्थितीत तुमचे मरण टाळू शकत नाही. तर फ क्त परमेश्वराचे नाम हेच तुमचे जीवन आनंदी समाधानी करु शकते.
अंत्ययात्रा स्मशानात पोहोचल्यावर अनेकांनी त्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहिली. त्याच्या जीवनाचे कौतुक केले. त्याची जीद्द लोकांसमोर मांडली व शेवटी त्याच्या मुलाने ऐक चिठ्ठी काढून वाचून दाखविली.
त्यात त्याने लिहीले होते.
माझा भ्रम होता जीवन जगणं हे सत्य आहे । पण शेवटी माझ्या लक्षात आले की मृत्यू हेच खरं सत्य आहे||
तेव्हा आनंदाने जगा इतरांचा विचार करा. त्यांना आनंदी करीत करीत स्वत: आनंदी रहा.
कारण जगणं हेच खरं सत्य आहे. मृत्यूला नजरे आड करु नका.