गुरुशिवाय ज्ञान नाही

पुराणकाळा पासून आपण गुरु बद्दल एक प्रार्थना म्हणतो, ती अशी –
गुरु ब्रम्हा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्‍वरा ।
गुरु साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: ॥

सर्व सृष्टीचे मानवाचे दैवत असे ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे गुरु आहेत. तेच या सृष्टीची , मानवाची निर्मिती करतात, पालन पोषण करतात व नको त्यांचे हनन करतात. असा हा सृष्टीचा क्रम आहे.

तेव्हा अशा गुरुंना कोणत्याही कामाची सुरुवात करताना वंदन करावे असे पुरातन काळापासून सर्व संतांनी सांगितले आहे.

विज्ञान युगात पण समोर येणारे शोध, त्यांची माहिती ही गुरुकडूनच होते, असे आपण पहातो. कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी गुरुची गरज आहे.

यासाठी गुरुवर आपली अनासक्त भक्ती असणे गरजेचे आहे. चिंतनाने श्रद्धेने प्रारब्धाने गुरु आपणास मिळू शकतात.

गुळाचा खडा ठेवल्यावर मुंग्यांची रांग लागते. त्याप्रमाणे तुमचे चारित्र्य पवित्र ठेवा. तुमच्या जवळ ज्ञानाचा साठा भरपूर ठेवा अनेक साधकांची शिष्यांची रांग तुमच्याकडे लागेल. उगाच कुणाच्या समोर ज्ञानासाठी रांगा लागत नाहीत.

जीवनातील प्रत्येक टप्प्यावर गुरुची अवश्यकता असते. तेथे त्याच्या ज्ञानाला महत्व असते. नुसते मोठेपणाला नसते. जो योग्य मार्गदर्शन करतो तो गुरु समजावा.

चांगले मार्गदर्शन करणारा गुरु भेटणे हे भाग्याचे लक्षण आहे. वाईट गुरुची संगत माणसाला अधोगतीस नेते, त्यामुळे चांगले मार्गदर्शन घडावे, सत्कार्य हातुन घडावे असे वाटत असेल तर पैसा, श्रीमंती यापेक्षा सद्गुरु महत्वाचा आहे.

आयुष्यात अशा सद्गुरुची प्राप्ती व्हावी, ही प्रार्थना.

खरोखर कोणत्याही गोष्टीचे खरे ज्ञान गुरुशिवाय होत नाही, हेच खरे…

Leave a comment