यशस्वी गीर्यारोहण यालाचा ध्येयपूर्ती, स्वप्नपुर्ती म्हणतात.
सृष्टी ही डोंगर दर्यांनी भरली आहे. आपला जन्म होतो तो या डोंगर दर्यांना पार करण्यासाठी.
इच्छित ध्येय गाठण्यासाठी सर्वांनाच हा गीर्यारोहणाचा लाभ होतो असे नाही.
पण ज्यांनी चिंतन केले, ध्येय ठरविले, अभ्यास केला ते मात्र या गीर्यारोहणामध्ये भाग घेतात.
गीर्यारोहण हा ऐक असाध्य खेळ आहे. पण हा खेळ खेळणारा तेनसिंग होवू शकतो. येथे गरज आहे ध्येयाची – अखंड परिश्रमाची, ज्याने ही आस धरली तो गीर्यारोहण पूर्ण करतो.
सामान्यांचे आयुष्य जन्म व मृत्यू यातच अडकलेले असते. ते संथ मार्गाने जात असतात. मार्गात समृद्धी असते, ऐश्वर्य असते पण इतरांची कदर नसते.
गीर्यारोहणमध्ये क्षणाक्षणात समोर अव्हान उभे असते. तेथे मनाला खंबीर करावयाचे असते. मागचा पुढचा कांही विचार न करता ध्येय प्राप्त करावयाचे असते.
ध्येय प्राप्तीचा क्षण वाया घालवायचा नसतो.
गीर्यारोहणामुळे मनुष्य धाडसी होतो. त्याची आसक्ती नाते संबंधातील कटुशिलता कमी होते.
आपण पाहतो गीर्यारोहण हा नेहमी डोंगर माथ्यावर जाण्याचा प्रकार आहे. आपणा सर्वांचा पालनहार डोंगरावर बसून आपणाला आमंत्रित करीत आहे. त्यांचे आमंत्रण जो स्विकारतो, त्याला तो जगदीश मार्ग दाखवितो व तो गीर्यारोहण यशस्वी करु शकतो.
इहलोकापासून परलोका पर्यंतच्या प्रवासाला आपण आपल्या आयुष्याच्या गिर्यारोहणाची उपमा देऊ शकतो.
आयुष्याच्या या गिर्यारोहणात आपले ध्येय कैलास – मानसरोवर गाठणे आहे.
अनंत अडचणी समोर आहेत पण तेथे गेल्यावर जो आनंद आहे तो इतरत्र कोठेही मिळणार नाही.
तेव्हा एकदा तरी गर्यारोहणाचा विचार करा, जीवन सार्थक होईल.