हिंदु धर्मामध्ये गणेशाचे अनन्य साधारण महत्व सांगितले आहे. गणेश हा सर्व देवांचा देव आहे. तो देवाधीदेव आहे.
त्याचे आगमन म्हणजे सर्व सृष्टीला आनंदी आनंद देणारे समजले जाते. सर्व मंगल कायामध्ये गणेश पूजन प्रथम सांगितले आहे.
श्रावणातील चतुर्थीला गणेशाचे आगमन होते व गणेशोत्सव सुरु होतो.
समाजामध्ये एकीची भावना असावी. प्रेमाची भावना असावी. यासाठी समर्थांनी गणेश उत्सवाला प्रेरणा दिली.
देश पारतंत्र्यात आहे. समाज अज्ञानात आहे त्या समाजात जागृती उत्पन्न व्हावी, स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी करावी या हेतुने श्रेष्ठ बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात गणेशोत्सवाची सुरवात केली.
हा गणेशोत्सव दहा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक साधक गणरायाची स्थापना आपल्या घरी या चतुर्थीचे दिवशी करतो.
हा उत्सव म्हणजे पारमार्थिक शिबीरच होय. यामध्ये साधकाला भक्ती, सेवा, पूजा, कशी करावी याचे प्रदर्शन केले जाते. हा उत्सव अनेक साधक एकत्र येउन मंडळे स्थापन करुन साजरा करतात.
गणरायाची आरास – सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन या सजावटीतून केले जाते. श्लोक प्रबोधनाचे कार्य पण या मंडळातून होते.
सर्वत्र आनंदी आनंद असतो. घरामध्ये मांगल्याचे वातावरण असते.
प्रथेप्रमाणे या दिवसापासून रोज सकाळी मंगलाचरण, आरती, प्रसाद या गोष्टी होत राहतात.
या निमित्त सुट्ट्या काढून चाकरनामे आपापल्या गावी येवून तेथे हा उत्सव साजरा करतात. सर्वत्र मोठा जोश पहावयास मिळतो.
यातून गणेशाचे स्मरण व हृदयात स्तवन होते. दहा दिवस त्याची पारायणे होतात व साधकाच्या मनामध्ये गणरायाचे अधिष्ठान होते.
मनशुद्धी, देहशुद्धी व हृदयशुद्धी या दहा दिवसात होतात.
हाच या दहा दिवसाच्या शिबीराचा प्रसाद म्हणून वाटला जातो.
अशा या गणनायक गणरायाला कोटी कोटी वंदना.