स्मरण म्हणजे आठवण – योग्य वेळी योग्य गोष्ट आठवणे याला स्मरण म्हणतात.
ज्ञान म्हणजे महिती घेणे. आपण रोज अनेक गोष्टीचे ज्ञान घेत असतो. अशा घेतलेल्या ज्ञानाचे कोठार आपणापाशी भरलेले असते.
पण योग्य वेळी त्या ज्ञानकोषातील अमुक एक गोष्ट कोठे आहे. याची जाणीव आपणास होत नाही. त्यावेळी वाटते एवढे ज्ञान असून काय उपयोग?
तेव्हा ज्ञान व त्या ज्ञानचे स्मरण या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत.
एखादा मुलगा वर्षभर भरपूर अभ्यास करतो ज्ञान संपादन करतो पण ऐन परीक्षेत प्रश्न सामोरे पाहून त्याला त्याचे उत्तर सापडत नाही, आठवत नाही, तो परीक्षेत नापास होतो.
यावरुन लक्षात येते की नुसते ज्ञान गोळा करुन उपयोग नाही तर मिळविलेल्या ज्ञानाचे स्मरण मेंदूमध्ये ठेवणे महत्वाचे आहे. तरच तो हजर जबाबी सज्ञानी होवू शकेल. बिरबल होवू शकेल.
जीवन जगण्यासाठी, उपयोग घेण्यासाठी ज्ञानाची गरज आहे ती प्रत्येकाने पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर त्या ज्ञानाचे स्मरण करणे गरजेचे आहे. त्या ज्ञानाची उजळणी करणे गरजेचे आहे.
परमेश्वर भक्तीने आपले मनोरथ, मनोबल उंचावते हे आपण जाणतो. म्हणून ती भक्ती मनांत स्मरणात रहावी यासाठी रोज परमेश्वराची आरती नामस्मरण आपण करतो.
भक्ती व आरती नित्य नियमाने केल्याने देवाचिये दारी उभे क्षणभरी. त्याने सिद्धी चारी पावियेल्या या उक्तीप्रमाणे या स्मरणातून आपणाला चांगली गती प्राप्त होईल.
तेव्हा प्रत्येकाने ज्ञान मिळविणेचा प्रयास करावा त्याच बरोबर ते स्मरणात रहावे यासाठी त्या ज्ञानाची पारायणे करावीत. हाच ज्ञान व स्मरणाचा उद्देश आहे.