धरती ही परमेश्वराची निर्मिती आहे.
सृष्टीत वृक्ष असणे हा निसर्गाचा नियम आहे. सृष्टीतील वृक्षामुळे मानवाचे अस्तित्व आहे. वृक्ष रहित धरती म्हणजे उजाड शनि, रवि यांच्या युती समान. तेथे मानवजात ओसाड होते.
झाडांमुळे पाऊस पडतो. त्यामुळे पाणी मिळते पाण्यामुळे अन्न तयार होते व अन्नावर आपले पोषण होते.
जीव व वन यातून आपले जीवन बनते. आपल्या आयुष्यासाठी सर्वात चांगले औषध म्हणजे पाणी, वृक्ष व शुद्ध हवा.
हे तीन मौल्यवान घटक सृष्टीचे प्रदुषण दूर करतात.
आर्किटेक्ट तुमच्या घराचे डिझाईन करेल, इंजिनियर डिझाईनर त्याची शोभा वाढवेल, पण घरात चैतन्य आणण्याचे काम झाडांमुळे होईल.
म्हणून आपण झाडांची घराभोवती आणि आपल्या परिसरात लागवण करा.
संत, सरोवर, तरुवर आणि मेघ हे प्रपंचातील चतुर्मुखी देव आहेत. त्यांचे रक्षण करा त्यामुळे धरतीवर स्वर्ग उतरेल.
श्राद्ध घालताना आपण तिर्थावर जातो व आत्मकल्ण्या साठी पूजा, दान, पिंडदान देतो.
जर आपण वृक्षारोपण केले तर झाडावर बसून पक्षी झाडाची फळे, खावून भोजन करतील व तेवढेच पुण्य तुम्हाला लागेल व धरतीवर स्वर्ग उतरल्या सारखे होईल.
एक झाड माणसाला एका दिवसात तीन सिलींडर भरुन ऑक्सिजन देतो म्हणजे 2100 रुपयाचा ऑक्सिजन झाड आपणास फुकट पुरवते तेव्हा आपण झाडे कां तोडवीत ?
वृक्षारोपण करा झाडांच्या सावलीत मनुष्य प्राणी प्रवासी शांततेचा अनुभव घेतात. गाड्यांना सावली मिळते. असे हे झाड कोणी लावले याची तेथे पाटी लावलेली नसते पण ज्याने लावले तो सर्वाना सुख शांती मिळावी या भावनेने परमेश्वरा कडे प्रार्थना करतो आणि वृक्षारोपण करतो.
यासाठी आपण आयुष्यात एकतरी झाड लावावे. लक्षात ठेवा अंतिम समयी या वृक्षांनी पुरवलेल्या लाकडांचीच संगत आपणास रहाते. आपणास सद्गति लाभावी म्हणुन ते झाडच आपणासोबत जळते.
ज्या माणसाने जन्मास येवून एक पण झाड लावले नाही त्याला मरणोत्तर सद्गती कशी लाभेल?
तेव्हा मरणोत्तर सद्गती लाभावी म्हणून वृक्षरोपण करा. यामुळे आपण वनस्पतीकाय जीवाचे संरक्षण संगोपन करतो त्यांना अभय देतो.
असे अभयदान करणे मोठे पुण्य कर्म होय. यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करावे अशी कृती करण्याने धरतीवर स्वर्ग उतरण्याशिवाय रहाणार नाही.
तेव्हा संकल्प करा वृक्षारोपणाचा.