जगण्याची रीत, पद्धत, घरातील संस्कार म्हणजे धर्म होय.
या धर्माचा जातीशी संबंध नाही.
धर्म म्हणजे जात नव्हे. मी जैन, मी ब्राम्हण, मुस्लीम, बौद्ध असे म्हणणे म्हणजे धर्म नाही.
ही झाली जात जी जात नाही. कधीही नष्ट होत नाही.
ज्यामुळे उच्च निच भाव उत्पन्न होतो. माणसाची खरी जात आहे मानवता.
सर्व माणसामध्ये माणूस पहाणे व हाच खरा धर्म आहे.
घरामध्ये जसे आपण एकीने रहातो तसे समाजामध्ये एकीने रहावे. यालाच धर्माची सुखात घरापासून करावी असे होय.
देव सर्वत्र भरुन आहे त्याची अनुभूती घरात घेणे यालाच धर्माची अनुभूती घरात घेणे होय.
जर घरात आजी, आजोबा, माता-पिता, नवरा बायको मुले एका विचाराने राहू लागले तर घराला मंदीर बनविण्याचे पुण्य लाभेल.
तसेचं त्या घरांत येणारा प्रत्येकजण मानवता वादी बनेल व असे संस्कार ज्या घरात होतील ते घर धर्माचे विद्यापीठ होईल.
ज्या घरात जन्मापासून मृत्युपर्यंत आपला वास होतो. तेथेच धर्माची मानवतेची सुखात होते.
परीवारात अशी वागणूक ठेवा जशी मंदीरात भगवंताशी ठेवतो तशी.
भगवंत निरागस आहेत ते वितरागी आहेत. त्यांनी काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर आसक्ती, अहंकार यांचा त्याग केलेला आहे.
आपण परीवारात त्या पद्धतीने रहाण्याचा प्रयत्न करु या. म्हणजे घरात भगवंताचे अधिष्ठान होईल.
अशा घराचे संपर्कात जे येतील ते पण या विद्यापिठाचे साधक बनतील.
यासाठी
1) स्वत:चे कर्तव्य स्वत: करा
2) दुसर्याच्या कार्यात सहयोग देणे मदत करणे
3) काम, क्रोध, मद, मोह इत्यादी दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळविणे हे तिसरे कर्तव्य झाले.
ज्या घरात प्रेम, सहकार्य हा भाव दिसतो त्या घरांत कुलदेवतेचा प्रवेश होतो.
परीवार – घर आपल्या जीवनाची पहिली पायरी आहे. जिथे मान, मर्यादा व जीवन जगण्याचे संस्कार दिले जातात.
मनाला मंदिर बनविण्यासाठी प्रथम स्वच्छतेचा अवलंब करा. ज्या घरात अडगळीचे साम्राज्य आहे तेथे वास्तु दोष येणारच.
मनांतील अडगळ काढून टाका.
कुणाचा अपमान करु नका.
चुकून झाला तर क्षमावृत्ती ठेवून क्षमाभाव जागृत करुन क्षमा द्या, क्षमा मागा.
आपल्यासाठी केलेल्या मदतीला विसरु नका.
त्या कर्जाची फेड करीत रहा याचाच अर्थ धर्माची सुखात घरापासून करा होय.