कोणतेही कार्य झाले की आपली नजर जाते ती त्या कार्याची फलश्रृति काय? हे पहाण्याकडे. जसे परीक्षा झाल्यानंतर निकालाकडे लक्ष लागते.
केलेल्या कष्टाचे फळ काय हे पहाण्याचा प्रयास म्हणजे फलश्रृति होय.
आज आपण चातुर्मासात केलेल्या नियमांचे, आचारांचे, विचारांचे, क्रियांचे फल काय मिळते याचा आढावा घेणार आहोत.
सर्वप्रथम चातुर्मास ज्या साधु, साध्वी, आचार्य भगवंत यांचे सानिध्यात होतो त्यांचा प्रभाव साधकावर, बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवर होतो.
छोटासा कां होईना रोज एक नियम घेऊन तो पाळला जातो. त्यामुळे जीवनाला थोडीफार शिस्त लागते.
प्रपंचात गुरफटून सतत पैशाचे पाठीमागे पळण्याची प्रवृत्ती कमी होत जाते. चिंतन, सामाईक, प्रतिक्रमण या गोष्टी काय आहेत व त्या केल्याने काय समाधान मिळते याची जाणीव चातुर्मासानंतर येणार्या प्रचितीने होते.
न कळत क्षमाभाव मनात निर्माण होतो.
पर्वकाळामध्ये भगवंताचे सानिध्य असल्यामुळे अहंकार व मत्सर भाव कमी होतो. ब्रम्हचर्य पालन नकळत होत जाते.
जप, तप, उपवास या गोष्टींमुळे अंतर्मनाची शुद्धता होते. र्हदयशुद्धी, चित्तशुद्धी होते व साधक परमार्थात पदार्पण करतो.
विशेषत: जेेष्ठ नागरिक जीवनाच्या तिसर्या टप्प्यावर प्रपंचातून विरक्त होवून संतांचे सानिध्यात जातात व त्या सानिध्याचा आनंद उपभोगतात.
चातुर्मासानंतर जीवन दृष्टी बदलते. प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.
‘मी कर्ता’ ही भावना कमी होते. ‘सर्वे संतु निरामया‘ ही भावना प्रकट होते.
हीच चातुर्मासाची फलश्रृति होय.