प्रपंचात काय, व्यवसायात काय, वाहन चालवताना काय, प्रत्येक ठिकाणी चालक परवाना असणे गरजेचे असते.
तो परवाना घेण्यासाठी कांही अटी असतात व त्या तपासण्यासाठी त्याची संकेत स्थळे नेमलेली असतात. त्या स्थळावर जावून आपण त्या अटीची पूर्तता करुन परवाना घ्यावयाचा असतो.
एकदा मी मित्राबरोबर गाडीचा चालक परवाना घेण्यासाठी आरटीओ मध्ये गेलो.
तेथे जाताच मला एक बोर्ड दिसला, त्यावर कांही नियम लिहीले होते.
1. तुम्ही वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत का?
2. तुम्ही आरोग्य दृष्ट्या, शाररीक दृष्ट्या कुठे अपंगत्व, अक्षमता दाखवत नाही ना?
3. तुमचे डोळे, कान सक्षम आहेत का?
4. ठिकठिकाणी लावलेल्या धोक्याच्या पाट्या तुम्हाला आकलन करता येतात का?
5. हॉर्न कुठे वाजवायचा व कुठे नाही वाजवायचा याचे तुम्हाला भान आहे काय?
6. पुढील वहानाला ओलांडून पुढे जाणेसाठी तुम्ही काय खबरदारी घेणार?
अशा अनेक प्रश्नांचा एक फॉर्म पण तेथे दिला जातो. चालकाने तो शांतपणे वाचायचा असतो व त्याची उत्तरे शोधण्यासाठी चालक शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावयाचा असतो. तेथे हे सर्व प्रश्न व त्याची उत्तरे चालकाला पढविली जातात.
नंतर एक दिवस त्या चालकाची चालक परिक्षा घेण्यात येते. सर्व गोष्टी व्यवस्थित सोडविल्या नंतर त्याचे जवळ समाज व्यवस्थेचे आपत्काळी येणार्या संकटाला तोंड देण्याचे शिक्षण आहे किंवा नाही हे पण पाहिले जाते. प्रथमोपचार व आपत्कालीन सेवा त्याला जमतात का नाही हे पण पाहिले जाते व नंतर त्याला चालक परवाना दिला जातो.
हा परवाना जसा गाडीचा मिळतो तसा तो प्रपंचाचा पण मिळवावा लागतो.
प्रपंचातील चालकाच्या अटीपूर्ण केल्यानंतर त्याच्या हातात प्रंपचाच्या गाडीची चावी दिली जाते. प्रपंचातील धोके त्याला सांगितले जातात. कुठे थांबायचे, कुठे वेगांत गाडी पुढे न्यायची याचे ज्ञान दिले जाते. याप्रमाणे या परवान्यायावर तो प्रपंचात निरनिराळ्या गाड्या खरेदी करतो.
प्रपंचात संपत्ती, समृद्धी निर्माण करतो. चालकाचा महत्वाचा गुण म्हणजे ब्रेक, थांबा, कुठे ब्रेक लावायचा याचे ज्ञान असणे महत्वाचे असते.
ज्याने हे ज्ञान घेतले तो प्रपंचाप्रमाणे गाडीचा उत्तम चालक होवू शकतो.
प्रत्येकाला प्रपंचाची गाडी ही चालवायची असते. पण भारी गाडी पण त्या गाडीला ब्रेक नाही तर अनर्थ घडतो.
तेव्हा प्रपंचात काय किंवा वहान चालविताना काय ब्रेक सक्षम असणे गरजेचे आहे.
प्रपंचात अनेक कलह उत्पन्न होतात. कलहाची तिव्रता कमी करण्यासाठी चालकाला ब्रेक लावण्याची कला अवगत असणे गरजेचे आहे.
जेष्ठांनी आपण आता वृद्ध झालो, आपण आता प्रपंचाचे, गाडीचे चालक कसे होणार असा विचार मनांत आणू नये.
त्यांनी गाडीच्या चालकाचा परवाना न घेता मनाच्या चालकांचा परवाना घ्यायचा असतो.
शरीर पळत नसेल म्हणून मन पळविता येते अगर थांबवता येते.
तेव्हा जेष्ठांनी मनावर ताबा ठेवून प्रपंचाचा गाडा पुढे न्यायचा असतो.
तेव्हा त्यांचे जवळ असलेला चालक परवाना आता त्यांनी मनाच्या गाडीला ताब्यात ठेवण्यासाठी उपयोगी आणावयाचा असतो.
तशी मानसिकता जेष्ठांमध्ये निर्माण झाली पाहिजे. परमार्थात पण या चालक परवान्याची नितांत गरज आहे.
काम, क्रोध, मोह, माया, आसक्ती या अडथळ्यांना कलेने बाजूला करुन यशस्वी वाटचाल करणारा प्रपंचरुपी गाडीचा उत्तम चालक होवू शकतो व तसा होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, ही इच्छा.
तूच आहे तुझ्या जीवनाचा चालक..
1 Comment
सौ. शीला केतकर
हा तर ब्लॉग फारच सुंदर लिहिला आहे
आणि आरटीओ ऑफिस चे नियम चालकासाठी कोणते आहेत तसे प्रपंच चालवताना कोणत्या अडथळे दूर करायचेत
हे पण डॉक्टर साहेब आपण फारच सुंदर सांगितले आहेत.
प्रपंच करत असताना कोठे थांबायचे कुठे ब्रेक लावायचा हे ज्याला कळले तोच उत्तम चालक.
आणि तोच त्याच्या जीवनाचा चालक होऊ शकतो.
फारच सुंदर ब्लॉग🙏 राम कृष्ण हरी🙏