चैतन्यवाणी

वाणी याचा अर्थ वचन, बोल. ज्या वचनांनी, बोलण्यानी माणसाच्या मनांत स्पुर्ति, चैतन्य, आनंद निर्माण होतो, त्या वचनाला, त्या बोलण्याला चैतन्य वाणी म्हणतात.

आजपर्यंत अनेक साधू-संत जन्माला आले. त्यांनी आपल्या वाणीतून साधकाला स्फुर्ति प्राप्त होईल, आनंद मिळेल अशी वचने प्रदान केली. हजारो साधकामध्ये चैतन्य निर्माण केले, अशा चैतन्य वाणी ज्या संतांचे मुखातुन बाहेर पडली त्यातुन ज्ञानेश्‍वरी, गीता, दासबोध या सारखे ग्रंथ समोर आले.

अनेक राष्ट्रीय संतांनी त्या वाणीचा प्रचार केला. त्यातील तत्वार्थ लोकांपर्यंत पोहचवला व जनजागृतीचे काम केले.

गोंदवले येथे असलेले ब्रम्हचैतन्य महाराज यांनी नामस्मरणाची दिक्षा साधकाला दिली. जन्मापासून शेवटच्या श्‍वासापर्यंत कसे नामाचे अनुसंधान टिकवायचे यांची शिकवण महाराजांनी साधकाला दिली, अशा चैतन्यय वाणीची काही वचने मी येथे नमुद करीत आहे. –

आहो मंदिरवासी जन । तुम्ही ऐकावे वचन ॥1॥
आल्या अथिती अन्न द्यावे । राम नाम नित्य घ्यावे ॥2॥
पूजा करावी त्रिकाल । अंगी वैराग्याचे बळ ॥3॥
भाव ठेवा रामा पायी । कोणा मागू नका कांही ॥4॥
नम्र व्हावे सर्वा भूता । परनारी जैसी माता ॥5॥

हरिपाठात एकनाथ म्हणतात –

हरिचाया दासा हरि दाही दिशा । भावे जैसा हरि एक ॥1॥
हरिमुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥2॥
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तेचि झाले अंगे हरिरुप ॥3॥
हरिरुप झाले नाणणे हरपले । नेणने गेले हरिचे ठाई ॥4॥
हरिरुप ध्यानी हरि रुप मनी । एकाजनार्धनी हरि बोला ॥ 5॥

चैतन्य पाठाबद्दल बोलताना महाराज म्हणतात, साधकाने आपली वृत्ती वैराग्यपूर्ण ठेवावी ते वैराग्य सात्विक असावे.

चैतन्यवाणीतून सांगताना महाराज म्हणतात, साधकाची श्रद्धा ही फार महत्वाची बाब आहे. दृृढ निष्ठेने, श्रद्धेने केलेले काम फलदायी होते. श्रद्धेबरोबर नम्रता असावी.

सर्व प्राणी मात्रांशी नम्रतेने वागावे, आचरणा बद्दल सांगताना महाराज म्हणतात, प्रपंचात साधकाने परस्त्री मातेसमान मानावी, तिचा सन्मान करावा.

तोंडाने परमेश्‍वराचे नामस्मरण करता करतां दाही दिशामध्ये भरलेेला परमेश्‍वर तुमचे मदतीस येईल. तुम्हाला मोक्ष सुख लाभेल.

वासनेबद्दल बोलताना महाराज म्हणतात. मनात वासनेला वास करुु देवू नका. विकारापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमचा पुनर्जन्म टळेल.

साधकाला मोक्ष प्राप्ती झाली, की सर्व गोष्टींचे ज्ञान होईल, अज्ञान नष्ट होईल. कोणत्याही गोष्टींची शंका रहाणार नाही. यासाठी सतत नामस्मरण करा.

ही ब्रम्हचैैतन्य संत वाणी होय.

1 Comment

  • सौ. शीला केतकर
    Posted November 6, 2022 2:26 pm 0Likes

    स्फूर्ती आणि आनंद देणारी वाणी म्हणजे चैतन्य वाणी. सातत्याने नामस्मरण करून अशा पद्धतीची वाणी आपल्या मुखातून येऊ शकते हे गोंदवलेकर महाराजांनी तर स्पष्ट सांगितले आहे.
    साधक जर नामस्मरणामध्ये असेल तर त्याची वाणी स्फूर्तीदायक निश्चितच होईल. त्याच्या वाणी मध्ये परिवर्तन होईल.
    🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment