ईश्वराचे दर्शन घ्यायला मंदीर पुरातन आहे का? गल्लीबोळातील आहे हा वाद विचारात पाडणारा आहे.
त्या पाठीमागे काही शास्त्र आहे का? याचा उलगडा आपणास करुन घ्यावयाचा आहे.
मंदीरे ही पुरातन काळापासून बनविली आहेत. ती मंदीरे उभारण्याची जी जागा शोधली जाते तेथे सर्व साधारण जास्तीत जास्त ऊर्जा असते. त्या उर्जेेची अनुभूती गुरु महाराजांना झालेली असते.
या अनुभुतीतून ती जागा निश्चीत केली जाते. त्या जागेवर एक खड्डा खाणला जातो. त्यांत एक तांब्याचा तुकडा टाकला जातो. तांबे ही वीजवाहू चुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीज चुंबकीय वैश्विक उर्जा स्वतःत व सामावून घेवून नंतर ती भोवताली पसरवायची हा उद्देश तांब्याचा तुकडा भगवंताचे मूर्ती खाली ठेवण्याचा असतो.
अशा मंदीरात विधीवत मुर्तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते व मंदीर उभारले जाते.
गल्ली बोळातील मंदीरात एवढी शास्त्रशुद्धता पाहिली जात नाही. हा या दोन्ही मंदीराचा फरक आहे.
मंदीरात आपण जातो तो कांही उर्जा घेऊन येण्यासाठी ती उर्जा पुरातन मंदीरात असते. ती गल्लीबोळातील मंदीरात असेल याची खात्री नसते. म्हणून दर्शन हे पुरातन मंदीरात जावून घ्यावे असे माझे मत आहे.
पुरातन मंदीरात प्रवेशाचे कांही नियम असतात. तसे नियम गल्लीबोळातील मंदीरात दिसत नाहीत.
मंदीरात जाताना आपण चपला, बूट काढून पाय धुऊन मगचं मंदीरात प्रवेश करतो. यामध्ये स्वच्छते बरोबर आध्यात्माचा विचार केलेला असतो. मंदीरात असलेली शुभ व पवित्र उर्जा दुषीत होवू नये हा त्यापाठीमागे उद्देश असतो.
मंदीराचे मध्यभागी अशी फरशी निवडलेली असते की जी मंदीरातील उर्जेचे उत्तम वाहन करते. ही सर्व उर्जा आपण अनवाणी मंदीरात जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा आपल्या तळपायापासून आपल्या शरीरामध्ये प्रविष्ठ होते.
अशा या प्रचंड उर्जेचा साठा असणार्या मंदीरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्या शरीरातील उर्जा ग्राहक इंद्रिये ती उर्जा स्वत:मध्ये सामावून घेतात.
शरीरात एक प्रकारची सकारात्मक शक्ती उत्पन्न होते. या गोष्टी पुरातन मंदीरात दिसतात तेव्हा भगवंत दर्शन हे पुरातन मंदीरातच जावून घ्यावे असे मला वाटते.
पुरातन मंदीरात प्रवेशद्वारा जवळ असलेली घंटा वाजविण्या पाठीमागे पण मोठे शास्त्र आहे.
पुरातन मंदीरातील घंटा ही विशिष्ठ सप्तधातु योग्य प्रमाणातं घेवून बनविलेल्या असतात.
त्यातून निर्माण होणारा प्रतिध्वनी किमान सात सेकंद रहातो. अशा घंटानादा खाली उभे राहून त्या नादाची कंपने स्वत:मध्ये सामावूघेतली जातात. त्यातून आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने काम करु लागतो.
नकारात्मक उर्जेचा नाश होतो. मंदीरात प्रवेश केल्या नंतर आपण ज्या गोष्टी करतो त्या पाठीमागे शास्त्रीय वैज्ञानिक कारण असते.
कापूर जाळणे, त्यावर हात फिरवून तो हात डोळ्यांना लावणे, दृष्टी साफ करणे या गोष्टी साधल्या जातात.
मंदीरातील तीर्थ तांब्याच्या/चांदीच्या भांड्यात ठेवले असते, त्यामुळे कफ, ताप हे आजार दूर होतात.
मंदीरातील मूर्ती भोवती आपण प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे तेथे पसरलेली उर्जा आपणास प्राप्त होते. तेथे मद, मोह, माया यावर ताबा मिळविण्याची शक्ती येते.
हे सर्व झाल्यावर आपण मंदीरातून चटकन बाहेर येऊन बाहेरील गजबजाटात जाऊ नये. ही उर्जा शरीरात सामावून घेण्यासाठी थोडावेळ मंदीराचे पायरीवर बसून राहण्याची प्रथा असते. ती पुरातन मंदीरातच असते. गल्लीबोळातील मंदीरात नसते.
त्यामुळे एकच एक ईश्वर पुरातन मंदीरात किंवा गल्लीबोळातील मंदीरात असला तरी दर्शन मात्र पुरातन मंदीरात जावून घ्यावे असे मला वाटते.