अक्षता याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे तांदुळ. त्याचे महत्व प्रपंचात व परमार्थात फार आहे.
अक्षता म्हणजे जे कधी कमी होत नाही किंवा ज्याचा कधी क्षय होत नाही असे.
लग्न समारंभ किंवा परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्याचे समोर ज्या अक्षतांचे स्वस्तिक काढले जाते, त्याला अक्षता आशिर्वाद म्हणतात.
लग्न समारंभात आलेली सर्व मंडळी अक्षताचे रुपाने वधू-वरांवर आशीर्वादाचे तांदूळ टाकतात.
येथे दुसर्या कोणत्याही धान्याचा उपयोग केला जात नाही. यामागेपण कारण आहे. तांदुळ (अक्षता) हे असे धान्य आहे की जे कधी आतून किडत नाही.
म्हणून विवाहानंतर पुढील आयुष्यात तुम्ही प्रेमाने, शुद्ध अंत:करणाने, पवित्र चारित्र्याने रहा असा आशीर्वाद अक्षता त्यांचेवर टाकून दिला जातो.
या शुद्धतेला धुतल्या तांदळाची उपमा दिली आहे. तुमचे पुढील आयुष्य धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असो.
ज्या लोकांमध्ये तांदळाचा जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, ती माणसे अतिशय बुद्धीमान, शिस्तप्रिय व सर्वांत अग्रगण्य समजली जातात. उदा. केरळी किंवा कोकणी माणसे.
प्रपंचात जेवताना जसे भाताने जेवणाची इतीश्री करतो, तसे परमार्थात परमेश्वर प्राप्तीसाठी अक्षताचा वापर केला जातो.
अशी ही अक्षता – तांदुळ याची मंगलकारी प्रसिद्धी आहे.
त्या अक्षतांचे महत्व ध्यानात घेवून त्याचा योग्य वेळी वापर करावा.