अज्ञानाचे ज्ञान

मनुष्य नेहमी ज्ञान व अज्ञान याचे द्वैतामध्ये वावरत असतो.

एखादी वस्तु घ्यावीशी वाटणे हे त्या वस्तुचे ज्ञान होय. पण ती कोणी बनविली कधी बनविली कशापासून बनली याचे आपण ज्ञान घेत नाही.

वस्तुच्या मोहात तर वर पाहून आपण वस्तुंची खरेदी करतो हा आपला अज्ञानाचा भाग असतो. त्यामुळे बरेच वेळा आपण फसतो याला कारण आपणाकडे अज्ञानाचे ज्ञान नसते.
माणसाला वस्तुच्या मोहामुळे त्या वस्तुच्या घडणावळीची कल्पना नसते. अज्ञान असते हे अज्ञान होय.

पण ज्यावेळी आपण खोलात जावून त्या वस्तुचे निरीक्षण करु त्यावेळी ते ज्ञान आपणास होईल वस्तुची खरी पारख होईल.

तेथे अज्ञानाचे ज्ञान त्याला फायदा करुन देईल.

मनुष्य जगतातील असंख्य गोष्टीचे ज्ञान घेईल. निरनिराळ्या ग्रंथांची पारायणे करील पण त्या ग्रंथकाराला त्यातून काय सार सांगावयाचे याचे ज्ञान घेणार नाही. तेथे ते अज्ञान त्याने केलेल्या पारायणातून निष्फळ बनविते. यासाठी प्रत्येकाला अज्ञानाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसणार्‍यांना ग्रंथांचे नांव माहित असते पण ग्रंथातील ओवीचे ज्ञान असत नाही. हे त्याचे अज्ञान असते पण तो मात्र सर्वत्र सांगत असतो. माझी ज्ञानेश्वरीची इतकी पारायण झाली.

त्याला ज्ञानेश्वरीचे पांघरुण आहे. त्याला आपल्या अज्ञानाची कल्पना नसते. ती कल्पना होणे याला अज्ञानाचे ज्ञान होणे म्हणतात.

प्रपंचात आज्ञानाच्या कारणामुळे आपण वस्तुंची गोदामे भरभरुन ठेवतो शेवटी त्या सर्व वस्तु भंगार होवून जातात. तेव्हा अशी विल्हेवाट लावणे गरजेचे असते.

जो योग्य वेळी हे काम करतो तो ज्ञानी समजावा त्याला अज्ञानाचे ज्ञान झाले असे समजावे. कोणत्याही गोष्टीच्या खोलात गेल्यावर त्या वस्तुचे ज्ञान करुन घेतल्यावर त्या वस्तुतून नवीन वस्तु निर्माण करण्याची कला माणसाला सापडते. तेथे अज्ञानाचे ज्ञान होणे जरुरीचे असते.

प्रपंच म्हंटला की चार माणसे आली. सर्वांची मते सारखी असतात असे नाही. जोपर्यंत ही गोष्ट अज्ञात असते तोपर्यंत सर्वांची मते सारखी समजून अज्ञानापेाटी आपण प्रपंच वाढवितो.

पुढे लक्षात येते, ज्ञात होते की आपली समज म्हणजे अज्ञान होय. अज्ञानाचे ज्ञान नसल्यामुळे आपण कित्येक सहकाऱ्यांवर आपली मते लादत असतो. हळूहळू ती माणसे आपणापासून दूर जातात.

आपण एखादी गोष्ट गृहीत धरुन चालतो. अंधविश्वासाने छाती ठोक पणाने आपले खरे सांगत असतो. हे आपले अज्ञान असते. ज्यावेळी त्या अज्ञानाचे आपणास ज्ञान होते तेव्हा आपण खरे ज्ञानी होतो.

ज्याचे जवळ मला कळत नाही याचे ज्ञान असते तो खरा ज्ञानी होय.
ज्ञान नाही हे कळणे हे मोठे ज्ञान आहे.

परमार्थात पण आपण कोण आहोत कशासाठी जन्माला आलो आहोत याचे आपणाला अज्ञान असते त्यामुळे जी गोष्ट आपण करावयाची याचे ज्ञान आपणाजवळ नसते.

ज्यावेळी हे अज्ञानाचे ज्ञान होते तेव्हा साधक परमार्थात स्थिर होतो.

प्रत्येकाने अज्ञानाचे ज्ञान घ्यावे.

Leave a comment