आत्मशुद्धी

जीवन हे अनेक अनेक वस्तु, प्राणी व पदार्थ यांनी भरलेले आहे. माणूस पाण्याची पण शुद्धी करुन प्राशन करतो. अन्नधान्याची शुद्धी करावी लागते.

शुद्धी करणे म्हणजेे वाईट गोष्टींचा त्याग करणे. चांगल्या गोष्टींची निवड करणे व जीवन आनंदमय बनविणे.

या शुद्धीचे पण प्रकार आहेत. 1. बाह्य शुद्धी, 2. अंतर्शुद्धी.

बाह्य शुद्धी आपण तुरटी, साबण, गाळणे इत्यादीने करु शकतो.

अंतर्शुद्धी म्हणजे आत्म्याची शुद्धी. ती सहजासहजी होत नाही.

तेथे मनांत जाणे गरजेचे असते. मनात जाणे म्हणजे एकांतात जाणे. तेथे योगा करणे, चिंतन करणे, आपण कोण आहोत, कशासाठी आहोत हे आरशात पाहून घेणे व विवेक जागृत करुन ध्येय निश्‍चिती करणे. नको असलेलेे विचार मन:पटलातून नष्ट करणे व मन:पटलावर ध्येयाची प्रतिमा स्पष्ट उभी करणे होय.

या सर्वांसाठी शुद्धी हे एकच साधन आहे. ही अंतर्शुुद्धी होय. बाह्यविकार अंतर्मनावर नेऊन त्यातील नको ते विचार त्याग करणे याला आत्मशुद्धी म्हणतात.

परमार्थातील ही महत्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला अनुसरुन मला एक प्रार्थना आठवली ती अशी –

आता परी हाच उपदेश ।
नका करु नाश आयुष्याचा ॥
सकलांचे पायी माझा दंडवत ।
आपले चित्त शुद्ध करा ॥

तुकोबांनी अर्जवून साधकाला चित्तशुद्धी – आत्मशुद्धीचा उपदेश केला आहे. अशा प्रकारे अंतरबाह्य शुद्धी झाल्यावर तो साधक साधूसंत, महंत, परमेश्‍वर होवून जाईल.

तसा आत्मशुद्धीचा प्रयत्न प्रत्येकाने करावा.

Leave a comment