बुडत्याला काडीचा आधार.
संकट काळी जो धावून येतो त्याचा आधार मोठा असतो. प्रपंचात रोज नवी संकटे येत असतात पण सद्गुरुवर श्रद्धा असेल तर ते यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितात. त्या मार्गाचे आचरण आपण करावे.
अतिशय अवघड प्रसंगी ते आधार देण्याचे काम करतात. स्वामी समर्थ म्हणतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !
देवाचिया दारी उभा क्षणभरी, त्याने मुक्ती चारी पावियेल्या।
ज्यांच्या दारात श्रद्धेने जावून त्यांना प्रेमाने भक्तीने आळविले तर जगातील कोणतेही संकट दूर होईल. जीवन आनंदमय होईल.
तेव्हा परमेश्वराचा सद्गुरुंचा आधार आपणास वाटावा ही अपेक्षा.
त्यासाठी प्रत्येकाने जीवनात सद्गुरु करावा.