आपण सारे, सगळे मिळून

एकदा मी बाजारात गेलो, भाज्या घेतल्या व फळे घेण्यासाठी म्हणून पुढे चाललो, रस्त्यात मला द्राक्षाचे दुकान दिसले. मी त्याला विचारले द्राक्षाचा भाव काय? त्याने द्राक्षाचा घढ हातात घेतला व म्हणाला 70 रुपये किलो.

मी पुढे जातो हे पाहून त्याने मला बोलाविले व सांगितले ‘ही घेऊन जा 40 रुपये किलोने.’ मी विचारात पडलो

द्राक्षे तीच पण भावात फरक का?

मी त्या शेतकर्‍यास विचारले असा फरक का?

तो म्हणाला हा जो घड आहे, त्या घडावर ही सर्व द्राक्ष एकत्रीतपणे शोभत आहेत. त्यामुळे त्यांची शोभा, त्यांची किंमत या अलग अलग झालेल्या द्राक्षाला येणार नाही. म्हणून मी तुम्हाला ही कमी किंमतीत देत आहे.

अलग झालेल्या द्राक्षांना त्यांची किंमत कळली आहे, तेव्हा एकीचे बळ काय आहे हे त्यांनी जाणले आहे. तेव्हा यापेक्षा जास्त नुकसान होण्याएवजी कमी किंमतीत त्यांची विल्हेवाट लागावी म्हणून मी ही सुट्टी द्राक्षे तुम्हाला देत आहे.

तेव्हा त्या टोपलीत असलेल्या सुट्ट्या द्राक्षातून मला आवाज आला, ती सुट्टी द्राक्ष म्हणत होती, ‘आपण सारे एकच आहोत मग सगळे मिळून का राहू नये.

आजपासून आपण प्रयत्न करु या एकत्र सगळे मिळून रहाण्याचा.

तरच समाजामध्ये आपली किंमत राहिल.

प्रपंचात पण आपण सर्वजण भेदभाव विसरुन वागू लागलो, तुझे-माझे न करता रहात गेलो, तर आपण प्रपंच आनंदात करु शकू.

तेव्हा सगळे मिळून एकीने प्रपंच करा असा संदेश यातून दिला आहे.

Leave a comment