परमार्थातील धोके

जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.

जसे छाप-काटा, खरा-खोटा, स्वार्थी-परमार्थी, मोही-निर्मोही, नम्र-अहंकारी, गर्वी-निगर्वी, सद्-असद्, गुरु-शिष्ट, श्रद्धा-अश्रद्धा, दयाळू-कृपण, संत-महंत, ज्ञानी-अज्ञानी, मानवी-अमानवी, मित्र-शत्रु, एकांत-अनेकांत, विवेकी-अविवेकी

तेव्हा असा मनांत विचार येतो की परमार्थ हा पण परमेश्‍वराकडे जाण्याचा राजमार्ग नाही.

तो देखील बर्‍याच खड्ड्या खुड्ड्याने , वळणावळणाने जाणारा अवघड मार्ग आहे.

त्या मार्गावरुन जाण्यासाठी आपली विवेक बुद्धी जागृत करणे गरजेचे आहे.

कोणत्या वळणावर गाडीला कसे वळवायचे हे तंत्र चिंतनाने व अनुसंधानाने ठरवायचे असते.

परमार्थामध्ये परमेश्‍वर साधकाला कल्पवृक्षाप्रमाणे इच्छीत फळ देतच जातो. माणसाच्या कुवतीपेक्षा खुप अधिक त्याच्या पदरात टाकतो. त्याची झोळी फाटेल इतके दान देत असतो.

या ठिकाणी पहिला धोका समोर येतो, लाल दिवा समोर दिसतो, तो असतो गर्वाचा – अहंकाराचा.

माझ्या सारखी, श्रीमंती, भक्ती या जगात कुणाकडे नाही. मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. हा धोका, ही लाल दिव्याची पाटी त्याला सागंते.

थांब, विचार कर तुझ्या गर्वाला आवर, अहंकाराचा त्याग कर.

तेथुन त्याची गाडी पुढे सरकते, परमार्थाच्या मार्गावर दुसर्‍या ठिकाणी तोच लाल दिवा परत त्याची गाडी थांबवतो.

तेथे ता प्रपंचातील सखे-सोयरे, जमीन जुमला, बंगला, घर यांचे मोहात अडकलेला असतो. शेवटच्या क्षणी देखील तो कोर्ट कचेर्‍या करुन त्या गोष्टींवर हक्क दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो.

तसे परमार्थातपण, आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा देखावा करण्यासाठी तो मंदीरे-ध्यानमंदीरे बांधतो. त्यावर आपले नांव पिढ्यान पिढ्या कसे राहील या साठी प्रयत्न करतो.

थोेड्याच वेळात लालदिवा मावळतो व गाडी परमार्थात वेगाने पुढे जाऊ लागते.

राजमार्ग गर्दीने अडवला जातो. कुणाला थांबण्यासाठी वेळ नसतो.

चिंतन-मनन हे दूर रहाते. फक्त अविरत पळणे पळणे हा कांहीजणांचा धंदा असतो.

तेथे राजमार्गावरील चौथा सिग्नल गाडी थांबवतो.

राजमार्गावर मध्यंतरी मोठा संकटाचा डोंगर उभा रहातो. तो मार्गच पूर्ण बंद करतो.अभियांत्रिकी येऊन त्या डोंगराला पोखरुन त्यातून मार्ग काढून देतात.

तसे परमार्थात पण अनेक अनेक संकटांचे डोंगर समोर उभे रहातात व साधकाला विवस्त्र करुन सोहतात.

पण जो खरा परमार्थी असतो. तो या संकटांना कधी भित नाही. त्यावर मात करुन डोंगर शिखरावर आरुढ होतो. त्याठिकाणी मात्र त्याला धोक्याचे वळण वाचवावे लागते व जो ते वाचवतो तो त्या संकटातून सही सलामत बाहेर पहतो.

आपल्या पूर्वजांना, साधू-संतांना पण परमार्थात जाताना असे अनेक धोके ओलांडावे लागले. त्यामुळे परमार्थ हा तसा सहज सोपा राजमार्ग आहे, असे नाही.

आपणास परमेश्‍वर भेटीसाठी परमार्थाच्या मार्गाला राजमार्ग बनवायचे आहे.

तेव्हा अडचणीच्या श्रृंखला तोडून परमेश्‍वर दर्शन घेण्यासाठी या धोक्यांचे महत्व लक्षांत घेणे गरजेचे आहे.

परमार्थात येणारे धोके पुढील प्रमाणे-

1. मद 2. मोह 3. माया 4 असक्ती 5 अहंकार 6 अश्रद्धा 7. अपरिग्रह 8. ब्रम्हचर्य

याचबरोबर परमार्थात जाताना ज्ञानाचा अभाव, सकारात्मक दृष्टीचा अभाव व आपले वागणे चारित्र्य संपन्न नसणे या गोष्टीपण धोक्यामध्ये समावतात.

तेव्हा विवेकाने या सर्व गोष्टींचे चिंतन करुन साधकाने मार्गक्रमण करावे.

Leave a comment