भगवंतांचे दर्शनाचा आनंद या लोकांनी समाजाला दिला. नुसते नवस बोलून मागण्यापेक्षा सूर्योदयााप्रमाणे लोकांच्या गरजा ओळखून तळागाळातील लोकांपर्यंत पुरवठा करणे, ही आजच्या मितीची गरज आहे.
जर सूर्याने आपले तळपणे दिवसभर चालूच ठेवले असते तर सगळीकडे हाहाकार उठला असता. लोक जळून खाक झाले असते, उकाड्याने कासावीस होवून सनस्ट्रोकने देहातीर्थी पडले असते.
तेव्हा सूर्यनारायण किती विवेकी आहे व तो आपल्या छटा कशा दिवसात बदलत असतो हे आपल्या लक्षात येते.
तेव्हा जेष्ठांना मला सांगावे वाटते, की तुमचे तळपणे संपले आहे, तुम्ही आता शांतपणे जगाकडे पहात रहा व केलेल्या कार्याचे मनन करीत थांबण्याची वेळ ठरवा. सूर्यास्त पहाण्यासाठी जगांत अनेक ठिकाणे आहेत. आपले कर्तुत्व लोकांना उघड्या डोळ्यांनी पहावे यासाठी प्रयत्न करा.
सूर्याच्या विविध छटातून जीवनाच्या विविध छटांचे दर्शन आपण घेतले. या दर्शनाने तृप्त होवून उद्याचा सूर्यादय आनंदाने पहाण्यासाठी आज निद्रावश होवूया.
शुभरजनी!