परमेश्‍वराच्या सत्तेनेच सर्व चालतं

परमेश्‍वरच सर्व सृष्टीचा कर्ता करविता आहे. हा विश्‍वास प्रत्येकाच्या मनांत असणे गरजेचे आहे.

हा विश्‍वास म्हणजे श्रद्धा.

ती अपरंपार असणे गरजेचे आहे. गावामध्ये कुणाची सत्ता असते तर सरपंचाची, जिल्ह्याला सत्ता असते आमदाराची , देशाला सांभाळणारा पंतप्रधान असतो.

तो सर्वांना सारखा पहात असतो. त्याने राग लोभ, मोह, ईर्षा याचा त्याग केला असतो. तो सतत जनतेच्या सुखाचाच विचार करत असतो त्यामुळे त्याच्या पेटीत मतांची झुंड लागली असते.

त्याचे म्हणणे सर्वजण मान्य करतात. अर्थात तोच सर्व देशाचा सत्ताधीश होतो. आता परमार्थामध्ये पण साधकाकडे अशा भावनेने पहाणार्‍या, निस्पृह भगवंताचे नाम समोर येते.

त्याच्या मनांत कुणाबद्दल राग लोभ नसतो. म्हणून त्याला परमेश्‍वर मानतात व त्याचीच सत्ता सर्वत्र चालते.

परमेश्‍वर कृपेनेच सृष्टीमध्ये सर्व गोष्टी होत असतात. परमेश्‍वराचे नामच साधकाला भवसागरातून तरण्याचे बळ देते.

झाडाचे पान देखील परमेश्‍वराचे इच्छे शिवाय पडू शकत नाही. परमेश्‍वराची सत्ता ज्याचे बाजुला आहे असा गरीबातील गरीब माणूस करोडो रुपये खर्च करणार्‍या श्रीमंतातील श्रीमंत माणसाला साध्य न होणारी गोष्ट करुन दाखवितो याचे कारण तेथे परमेश्‍वर हा सत्ताधीश असतो.

विज्ञान युगात माणसे अनेक अनेक शोध लावतात. अगदी मंगळावर उतरण्याची तयारी करतात. त्यात यश पण मिळवितात. पण जो पर्यंत परमेश्‍वराची मर्जी होत नाही तोपर्यंत तो मंगळावर वस्ती करु शकत नाही.

परमेश्‍वर हा ऐक मोठा संघटक आहे. त्याच्यापाशी प्रत्येकाच्या कर्माच्या नोंदी अचूक आहेत व एक बटण दाबले की त्याचा हिशेब समोर येतो व त्याचे फळ समोर येते.

म्हणून माणसाने कुठलेही कृत्य करताना कोण मला पहात आहे? कोण करोडोचा हिशोब ठेवत आहे. कोण घोटाळे करीत आहे. याची नोंद त्याचे कडे आहे हे विसरु नये. कारण त्याचेच सत्तेने हे सर्व चालू आहे व त्याची आपणावर नजर आहे हे विसरु नये.

परमेश्‍वर शॉर्ट हॅण्डमध्ये पारंगत आहे. हातापायावर शॉर्टमध्ये त्याने प्रत्येकाचे व्यवहार नोंद केलेले आहेत व त्याची परतीची तारीख नोंदविली आहे. त्यावर सील करुन ठेवले आहे. माणूस ते सील तोडू शकत नाही. त्यात फ रक करु शकत नाही. कारण परमेश्‍वराचे सत्तेनेच सर्व कांही चालू आहे.

असा परमेश्‍वर कुठे आहे असे कोणी विचारतात, तेव्हा तो कुठे नाही असे उत्तर येते..तो बहुरुपी बनुन सृष्टीत संचारत असतो. त्याचेच सत्तेने सर्व चालत असते.

अशा एक ना अनेक गोष्टी समोर येतात. तेथे लक्षात येते, हे सर्व घडविणारा अदृष्य कोणीतरी आहे व तो म्हणजे परमेश्‍वर होय. त्याला काय आवडते तर त्याच्या प्रेमात असणारी माणसे, त्यांचेसाठी तो रात्रंदिवस तपश्‍चर्या करीत असतो.

भुकेल्याला अन्न, नेसायला वस्त्र व रहाणेसाठी निवारा तो पुरवत असतो. त्यामुळे त्याची सत्ता अटळ होत जाते. त्याची आठवण प्रत्येकाने दिवसातून किमान एकवेळा तरी करावी.

आठवण म्हणजे नामस्मरण ते श्‍वासाबरोबर चालू ठेवावे.

2 Comments

  • Nandan Bhandari
    Posted January 16, 2023 12:11 pm 0Likes

    Very nice. Very nice thoughts.

  • Nandan Bhandari
    Posted January 16, 2023 12:11 pm 0Likes

    Very nice thoughts.

Leave a comment