रोजच्या व्यवहारात सुख, सुखी हे शब्द आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी वापरतो.
सुख ही कांही वस्तू नाही. सुख ही कांही दाखविण्याची, मिरविण्याची बाब नाही. सुख गरिबी श्रीमंती असा भेद मानीत नाही.
ते सुख कोठे आहे, असा प्रश्न विचारला, तर कोठे नाही? ते सर्वत्र आहे.
पण ते पहाण्याची दृष्टी हवी, दृष्टीकोन हवा हा दृष्टीकोन यावा यासाठी वडील मंडळी सुखी भव असा आशीर्वाद देत असतात.
चार बोटा एवढी पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसृष्टीतील अनेक पदार्थ बनविले जातात. सर्व सृष्टीतील अनेक पदार्थ बनविले जातात. सर्व सृष्टीतील साधनांचा उपयोग करुन पाककृती करुन साधकाला भरविले जातात.
यातून साधकाला सुख मिळवायचे असते पण ते सूख देणारा, आचारी निघून गेला तर सुखपण निघुन जाते.
तेव्हा जैन परंपरेत सुख हे स्वादावर अवलंबून नाही. असे सांगितले आहे. ते ज्या रुपात समोर येईल त्या रुपात ते आपलेसे करा हा संदेश दिला आहे. पोटांत त्या एकत्र होतच असतात.
त्यामुळे बाहेरील स्वादावर अवलंबून आपण सुखाचा विचार करु नये. अन्न हे परब्रम्ह आहे. त्याचे सेवन भक्तीने करा त्यात खरे सुख आहे.
संपत्ती, संतती आपणास सुख देतीलच असे नाही. त्या गोष्टी आपणास शेवटपर्यंत साथ देतील असे नाही. त्यामुळे त्यांची लालसा ठेवू नका. यातच खरे सुख आहे.
माणसे एकमेकांचे संपर्कात येतात. एकमेकांसाठी प्राण देण्याची भाषा करतात. जरी ही क्रिया दु:ख दायक असली तरी त्यामध्ये प्रेम हे मानवी जीवन उजळून टाकणारे असते.
तेथे मनाला खरे सुख लाभते.
तेथे थोरामोठ्यांचा आशिर्वाद कानी पडतो.
सुखी भव.
सुख हे सहज साध्य व सर्वत्र मिळणारी गोेष्ट आहे. पण त्यासाठी माणसाने आपला विवेक जागृत केला पाहिजे. चिंतन, मनन करुन इतरांना सुखी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
जीवनांत गरजेपुरते मिळवा, कमवा गरज संपताच कर्मातून आलिप्त व्हा. मोहात, मायेत अडकू नका.
लांडी लबाडी करुन प्रपंच करण्याचा हव्यास सोडा, शत्रुला मित्रत्वाने जिंका. दुसर्यांच्या चुकांना क्षमा करा. त्या चुका आपल्या हातून होणार नाहीत याची खबरदारी घ्या.
चिंता करु नका, चिंतन करा,
संपत्ती साठवू नका, मानवतेची साठवण करा
या गोष्टीतून तुम्हाला न दिसणारे सुख मिळेल.
तुमचे जीवन सर्व अर्थानी सुखी होईल.
तेथे जाणवतील शब्द सुखी भव.