मै अहंम् था वही वहेम था

जीवनात समज – गैरसमज असतात.

माझे शिवाय जग चालणार नाही. मी आहे म्हणून सर्व आहे असा गर्व माणसाला होतो.

हा गर्व म्हणजे मी पणा – मै – अहंम व तोच मनाला जो पर्यंत कळत नाही, तो पर्यंत तो गर्वात जीवन जगत असतो.

त्याची जीवनात, राजकारणात, घरप्रपंचात, चांगली प्रगती होते. तेथे गर्वाची झलक त्याचे चेहर्‍यावर उमटते. तेथे मी असल्याचा भ्रम समोर उभा रहातो.

माझ्या शिवाय या जगांत पान ही हलणार नाही. असा गर्व होवू लागतो आणि या गर्वाचे हरण पण याच जन्मात, याच घरांत, याच समाजात होते.

असा हा वैभव संपन्न गर्विष्ठ माणूस जेव्हा या जगातून निघून जातो, त्यावेळी थोडीफार अडचण उभी रहाते. थोडे दिवसात तेथील कार्य पुर्ववत सुरु होते.

तेथे आपला समज दूर होतो. मला जो गर्व झालेला असतो तो दूर होतो.

तेथे लक्षात येथे माझ्या शिवाय कुणाचे काहीच अडत नाही. सर्व कांही सुरळीत सुरु आहे. तेव्हा मला लक्षांत आले “मै अहम् था, वही वहम् था”.

तेव्हा हा भ्रम प्रपंचात वावरत असताना आपण काढून टाकला पाहिजे .

परमार्थात पण हेच दिसते. राम कृष्ण ही दैवते सृष्टीमध्ये उतरली व त्यांनी जगतात वैभव निर्माण केले व ते निघून गेले लोक थोडावेळ शोक करुन पुन्हा आपल्या उद्योगात रमले, तेथे माझ्या सारख्या साधकाची काय कथा?

मी जाता राहिल कार्य काय?

मै, मी हा गर्व आहे व तोच खरा भ्रम आहे.

या भ्रमातून आपण बाहेर पडणे गरजेचे आहे. येथे या जगाचा या घराचा या राजकारणाचा मोह आपण कसे सोडणे गरजेचे आहे, हे दर्शविले जाते.

प्रपंचातून निर्मोही होवून आपण बाहेर पडले पाहिजे. मोही कुणाच्या कां गुंतावे. अशी समज येणे ही परमेश्‍वर कृपाच होय.

या जीवनांत येवढी समज आली तरी खूप झाले. परमेश्‍वरा तू मला ही समज आणून दिली त्याबद्दल तुला कोटी कोटी वंदन.

माया, मोह, आसक्तीवर विजय मिळविणे हेच जीवनाचे खरे सार आहे व हीच परमेश्‍वर कृपा होय.

Leave a comment