यालाच जीवन पथ, जीवन मार्ग किंवा जगण्याच्या कला असे म्हणतात.
हे मार्ग दोन प्रकारचे आहेत.
1. स्वच्छंदी जगणे – आपल्याला हवे तसे जगणे
2. इतरांचा विचार करीत : इतरांवर अवलंबून त्याप्रमाणे जगणे.
म्हणजे पराधीन आहे जगती जीव मानवाचा.
याप्रकारे माणूस जगत असताना या दोन प्रकाराने जगत असतो.
कांही माणसे हेकट स्वभावाची असतात. त्यांना त्यांचे जवळ असलेल्य कलेचे, पैशांचे प्रसिद्धीचे एवढे महत्व वाटते, की ते गर्विष्ठ होतात.
त्यांना दूसर्याची कदर नसते. त्यांचे मनामध्ये फक्त स्वत:चा स्वार्थच असतो. ते स्वछंदी, स्वार्थी असतात.
प्रपंचात अशा लोकांची गर्दी असते.
जीवनात अशी ही माणसे भेटतात, ज्यांनी प्रपंच उत्तम केला असतो व प्रपंच करीत करीत आता ते वानप्रस्थाश्रमात वळले.
त्यांची वृत्ती त्याबरोबर बदललेली दिसते. त्यांचे वागणेत, विचारात इतरांचा विचार दिसून येतो. ते विचारी असतात. हेकेखोर नसतात.
ही पारमार्थीकाची प्रपंचातून झालेली वृत्ती होय. येथे स्वार्थ सोडून परमार्थीक वृत्तीने रहाण्याचा तो प्रयत्न करतो.
हा पहिल्या मार्गातून दूसर्या मार्गात जाण्याचा प्रयास आहे.
प्रपंच करीत असताना स्वार्थापोटी साधक इतरांच्या भावनांचा विचार करीत नाही.
तेथे फक्त स्वार्थच स्वार्थ जाणवतो.
त्या स्वार्थापोटी त्याचे जीवन क्लेषदायक होवून जाते.
राग लोभ आसक्ती यांची जीवनभूमीवर छाया पसरते .
द्वेषाचे सेनापती आपली विजय पताका फडकवीत असतात.
जीवनमार्ग कठीण होवून जातो. ही नैराष्यता साधकाला चहुबाजुने घेरते.
अशावेळी माणसाने चिंतनानेे यातून बाहेर कसे पडावयाचे हे ठरवायचे असते.
हा विचार त्या साधकाला जीवन जगण्याचा दूसरा मार्ग दाखवितो.
साधकाने त्या मार्गावर विश्वास ठेवून, ज्ञानाचा उपयोग करुन संतांची गुरुजनांची सतत संगत ठेवली तर त्याचे सर्व दोषहरण होतील व तो यशाचे शिखरावर आरुढ होईल.
मात्र साधकाने प्रपंचातील मोहाच्या फंदात अडकू नये.
साधकाने जीवन जगर्याच्या या दोन्ही मार्गाचा विचार करुन वाटचाल करावी.