संत वाडमयाचा विचार करताना समोर येणारी कांही नावे अशी –
1. निवृत्ती
2, ज्ञानदेव
3. सोपान
4. मुक्ताबाई
या चार संतांना धरुन आध्यात्मात जाताना साधकाच्या मनाची अवस्था कशी होत जाते, याची प्रचिती येते.
संत महंत प्रपंचातून निवृत्त होतात. ते मी पणा सोडतात. मी पणाची त्यांचे ठिकाणी निवृत्ती आढळते. तेथे निवृत्तीची आठवण हाते प्रपंचाची निवृत्त झाली की, मग ज्ञान प्राप्ती होते.
निवृत्ती नंतर खरी ज्ञानप्राप्ती होते हे सांगण्यासाठी ज्ञानदेवांना अवतार घ्यावा लागला. ज्ञान प्राप्तीनंतर जीवनमार्ग सोपा झाला.
सोपान देवांनी सांगितले व मन सोप्या मार्गाने अध्यात्मात शिरु लागले. या सर्व प्रयत्नांती सोप्या मार्गातील ज्ञानातून आत्मा सहज मुक्त होतो.
मुक्ताबाई अवर्जुन सांगत आहेत. अशा या अध्यात्म मार्गात जाण्याच्या मनाच्या अवस्था संतांचे रुपाने दर्शविल्या आहेत. त्याचे स्मरण साधकाने नेहमी ठेवावे.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई याप्रमाणे मनाची प्रपंचातून अलिप्त होण्यासाठी निवृत्तीनाथांनी प्रयत्न केले.
या गोष्टीचे ज्ञान व्हावे हे सांगण्यासाठी ज्ञानदेवांना अवतार घ्यावा लागला. त्यांचे आगमनामुळे जीवन प्रवास सोपा झाला व साधक सोप्या मार्गाने जीवन जगू लागला. तेथे सोपान देवाची भक्ती कामा आली.
सोप्या मार्गाने ज्ञान झाले की, मोक्ष प्राप्ति सहज होते व साधकाला मुक्ती मिळते.
हे चौथ्या मुक्ताईने दाखवून दिले.
या चौघांनी मानवी मनाची होणारी घालमेल शांत केली.
मानव जातीला मुक्तीचा मार्ग दाखवून दिला. आपण जर खरे प्रापंचिक असू तर परमार्थाची वारी करण्यासाठी या चार संतांची आठवण मुखी ठेवू. त्यामुळे मन प्रपंचातून परमार्थाकडे वळेल. अशी आहे ही मनाची व संतांची प्रपंचातून आध्यात्मात शिरण्याची वारी.