मुंगी बनून साखर खा, साधी चिमुरडी मुंगी पण साखर खाण्यासाठी नम्र होते. कुठे गाजा वाजा न करत साखरेपाशी जाते व साखर खाते.
तसे जर प्रपंचात आपणाला ऐहीक सुख प्राप्ती हवी असेल तर आपली वाटचाल कशी असावी याचे विवेचन तुकोबांनी येथे केले आहे.
ते म्हणतात, आपणाला सुख हवे असेल तर दु:ख काय आहे. याची जाणीव असणे गरजेचे आहे.
दु:खाचे घाव ज्याने सोसले त्याला सुख काय आहे हे कळले.
तहान लागल्या शिवाय पाण्याची किंमत कळत नाही.
तेव्हा तहान आसक्ती काय हे जाणून घेवून ती आसक्ती कितपत जपायची याचा विचार करा.
अग्निची दाहकता लक्षांत येताच वायुची शितलता आणण्याचा प्रयत्न करा. क्षमावृत्ती जागृत करा.
त्यातून तुम्हाला समाधान लाभेल.
विजयाचे सुख पराभवाच्या अनुभूतीतून येते. देवत्व हवे असेल तर दगडाप्रमाणे घाव सोशीत रहा, त्यातून परमेश्वराची मुर्ति साकारेल. त्या दगडाला देवपण येईल.
कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नाही किंवा परमेश्वर नाताळची भेट म्हणून पाठवत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
सेवकाप्रमाणे सर्व कामे, प्रेमाने, आवडीने, श्रद्धेने करावी लागतात. तेथे कामचुकारपणा करुन चालत नाही.
एखाद्या शिपायाप्रमाणे दरवाजात उभे राहून नम्रपणे लोकांना वंदन करीत राजाश्रय मिळवावा लागतो.
जो श्रद्धेने, नियमीतपणे, एकाग्र होवून साधना करतो, तोच पाषाणातून देव प्रकट करु शकतो.
असाध्य ते साध्य करीता अभ्यास हा अभ्यास गुरुवर श्रद्धा ठेवून त्यांचा मान राखून करावा. तरच ते कार्य यशस्वी होते.
सच्चाई, इमानदारी, श्रद्धा, अंगीकार करा, गवताप्रमाणे कोमल व्हा, दगडा सारखे सोन्याला महत्व द्या. सोन्याची आसक्ती ठेवू नका, तरच तुम्ही उत्तम सेवक बनाल.
परमेश्वर तुम्हाला बोलवून घेईल, तुमचा सन्मान करेल.
1 Comment
सो. शिला केतकर
अगदी बरोबर
दुःखाचे घाव सोसल्याशिवाय सुख म्हणजे काय कळत नाही ही गोष्ट अगदी सत्य आहे
तसेच सुखप्राप्ती हवी असेल आणि आपण भगवंताला प्रिय व्हावे असे वाटत असेल तर सेवक बना श्रद्धावान व्हा गुरूवर श्रद्धा ठेवा आणि कामे कर्म करू नका निश्चितच सुखप्राप्ती होईल आपला सारांश आवडला🙏