कागद

रोज संपर्कात येणार्‍या कचपट कागदाची कहाणी आज आपण पहाणार आहोत.

कागद व मनुष्य जन्म पहा….

कोरा कागद मनुष्य जन्मा सारखा कोरा करकरीत असतो.त्याला नाव ना गांव ना ठाव असते.

जेव्हा आपण त्या कोर्‍या कागदावर ‘श्री’ लिहीतो तेथे त्याची पूजा होते, त्याचे नामकरण होते.

त्या कोर्‍या कागदावर प्रेमाचे चार शब्द लिहीले की ते कागदाच पानं जपलं जाते.

लहान बालकाची प्रेमाने निगा ठेवली जाते, त्या प्रमाणेच कागदाची देखील निगा ठेवले गरजेचे आहे.

कांही विचित्र संस्कार झाले तर कागदाच्या पानाची जशी लहानमुले विमान करुन आकाशात भिरकावतात, कोणी कागदाची होडी करुन पाण्यात सोडतात ताशी कागदा प्रमाणेच बालकाची पण हेळसांड होते.

याच कागदाच्या पानाचे चक्र बनवून माणूस सर्वत्र फिरत असतो तर तोच कागद पैशाच्या रुपाने वाईट संगतीत नेऊन त्याला जीवनातून उठवून लावतो, त्याची नाचक्की करतो.

कागदाच पानच त्याला लोकांचे नजरेतून उतरवते.

हेच कागदाच पान लेखकाच्या लेखणीला डोक्यावर घेते. एखाद्या लेखकाच्या किंवा चित्रकाराच्या मनातील भावना प्रकट करते.

हेच कागदाचं पान व्यापारी लोकांना हिशेबाचं भान ठेवते. तर हेच कागदाचं पान वकिला बरोबर कोर्टात गेले तर साक्ष पण ठरते.

हेच कागदाच पान एखाद्याचे गुपीत राखते, पण त्यावरचा पेपरवेट काढून घेतला की हेच पान सर्वत्र सैराटा सारखे नाचक्की करीत उधळते.

याच कागदाचे पानावर बातम्या छापल्या जातात. त्या वर्तमान पत्र म्हणून प्रसिद्ध पावतात.

त्याच कोर्‍या कागदाचे पानावर आयुष्यात येणार्‍या निरनिराळ्या प्रसंगाप्रमाणे प्रश्न छापले जातात व माणसा समोर प्रश्न पत्रिका उभी रहाते.

कागदाचे पान विवाहाचे निमंत्रण पत्रिका होते तर ती पत्रिका सर्वत्र पाठविली जाते. तर त्याच कागदाच्या पानाकडे पाहून वधुवरांचे प्रापंचिक जीवन कसे असेल हे ज्योतीशी सांगत असतो.

याच कागदाचे पानावर सरकारी आदेश-संदेश छापले जातात तेव्हा ते टपाल होते.

असे हे माणसाचे जीवन व कागदाचे पान आहे.

अशा या कागदाच्या पानाला जीवनाला आपण चोळा मोळा करुन टाकू नये त्याला बँकेत आपण जसे दागिने लॉकर मध्ये ठेवतो तसे खंबीर पणे जपावे.

हा कागदाचं पान म्हणजे माझ्या हृदया प्रमाणे कोरा कागद आहे.

त्याला हृदयाच्या तिजोरीत सांभाळून ठेवा तो कचपटा प्रमाणे इकडे तिकडे टाकू नका.

Leave a comment