भ्रम-निद्रा-जागृती-जाणीव या माणसाच्या नित्य दिनचर्येत येणार्या गोष्टी आहेत.
निद्रा म्हणजे झोप व जागृती म्हणजे जाणीव.
ज्यावेळी अपण निद्रेत असतो त्यावेळी आपणाला कोणत्याही गोष्टीची जाणीव नसते. आपण अंध:कारात झोपलेलो असतो.
या निद्रेमध्ये माणसाला अनेक प्रकारची स्वप्ने पडतात. त्या स्वप्नांत तो गुंग होतो कधी कधी भयानक दु:ख देणारी स्वप्न पडतात, त्या स्वप्नामध्ये त्याला भिती उत्पन्न होते, तो झोपेतच चालू पळू लागतो.
एवढेच नाहीतर चालत चालत तळ्यात पाण्यांत बुडी मारतो.
तेथे त्याला जाग येते व त्याला अनुभव होतो की आपण बिछान्यावर निवांरा आराम करीत आहोत. मग मनांत शंका येते, मघाशी पाहिले ते काय?
तेथे लक्षात येते. तो भ्रम होता निद्राभ्रम होता.
आयुष्यात हर घडी प्रत्येकाला असे भ्रम पडत असतात. त्या भ्रमातून त्याला कधी आनंद तर कधी दु:ख असे अनुभव येतात. याला उपाय काय ? – जाणीव.
आपणाला माहित नसते आपण कोण आहोत. आपण भ्रम निद्रेत असतो. आपल्या समोर भिती उभी असते भिती म्हणजे भ्रम निद्रा.
स्वप्नातून भ्रम निर्माण होतो भिती उत्पन्न होते भ्रमामध्ये सामोर्या येणार्या गोष्टीशी सामोरे जाण्याची असमर्थता आपणास वाटते त्यामुळे दु:ख वाटत रहाते.
स्वत:चा शोध घेण्याची क्षमता कमी पडते तेथे भ्रमाचा पगडा चालू होतो.
त्यामुळे मनुष्य नेहमी निद्रिस्त अवस्थेमध्ये जगत असतो. आपली असमर्थता तो सारखी सांगत असतो.
हा त्याचा भ्रम असतो. तो भ्रम निद्रेत वावरत असतो ज्यावेळी तो निद्रेतून जागृतीत जातो त्यावेळी त्याला पुढील मार्गाची आरोळी त्याच्या कानावर पडते.
उठ, जागा हो व तुझे विहीत कर्म कर ते सामर्थ्य तुझ्यात आहे ही जाणीव होणे म्हणजे भ्रम निद्रेतून जाग येणे होय.
अशी जाणीव मोठ मोठ्या राष्ट्रीय साधु संतांनी निद्रीत असणार्या जनतेस वेळोवेळी दिली. त्यामुळे देशावरचे संकट दूर झाले. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, आचार्य विनोबा भावे, रयतेचे भाऊराव पाटील ही उदाहरणे समोर आहेत.
आपण प्रपंची माणसे घोर अशा भ्रमनिद्रेत मग्न आहोत. साधु-संत महंत आपणाला जगे होवून स्वत:चा शोध घेण्याची हाक देत आहेत.
आपण जागे होवून भिती मुक्त होऊन येणार्या प्रसंगाला तोंड देण्याचे धारिष्ट करुया.