प्रचिति शब्द ऐकला की एक ओळ ध्यानात येते.
‘‘दिव्यत्वाची जिथे प्रचिति तेथे कर माझे जुळती ॥’’
आपण सतत कर्म हे करीत असतो. कोणत्याही कर्माचे चांगले अगर वाईट फळ हे समोर येते. जे समोर येते त्याला प्रचिति म्हणतात.
जे आपण स्वप्नात पहातो व ते समोर दिसले की आपण प्रचिती आली म्हणतो. बाहेर पडताना समोरुन मांजर आडवे गेले व पुढे पण आपणाला प्रचिती येते. शकुन, अपशकून या गोष्टीपण प्रचितिवर ठरवल्या जातात. लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात. पण अनेक वेळाचे अनुभव पाहून त्याचे अनुमान केले जाते. त्याला प्रचिती म्हणतात.
चांगला अभ्यास करुन चांगल्या संगतीत राहून मिळविलेले उज्वल यश ही त्या विद्यार्थीने केलेल्या अभ्यासाची प्रचिती असते.
प्रपंचात गर्वाने फुगून जावून मिरविणार्या माणसास एखादे वेळी अपयश येते व तेथे त्याच्या गर्वाची त्याला प्रचिती येते.
आपल्या हातून कर्म हे अखंड घडतच असते. ते कधी थांबत नाही. मात्र आपण थांबले की ते पुढे येऊन थांबते व आपणास आपल्या कर्माची प्रचिती दाखविते.
जर चांगले कर्म केले तर त्याची चांगली व वाईट कर्म केले तर त्याची वाईट प्रचिती पहावयास मिळते.
कांही वेळ ही प्रचिती लगोलग पहावयास मिळतेच असे नाही पण काळांतराने किंवा भवांतराने पण याची प्रचिती समोर येते ही गोष्ट खरी आहे.
प्रचिती ही पूर्व आयुष्याच्या तिसर्या टप्प्यावर आरुढ झालेले आहेत. त्यांनी गत काळात केलेल्या कर्माची फळे आता त्यांचे समोर येऊन उभी टाकली आहेत. त्या कर्माची प्रचिती त्यांना वेळोवेळी जाणवत आहे.
तेव्हा त्या प्रचितीला न घाबरता आपणच आपल्या मनाला समजावयाचे आहे. यापुढील आयुष्य सुख समाधानात घालवायचे असेल तर चांगले विचार मनांत रुजवा चांगल्या चांगल्या गोष्टी करा.
आनंदी वृद्धापकाळ घालवा. तेथे आयुष्यातील सर्वोत्तम आनंद तुम्हाला भेटेल व कृतकृत्य झाल्याचे लक्षात येईल व तुम्ही पुन्हा म्हणाल –
दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.
1 Comment
सो. शिला केतकर
माणसाला त्याच्या कर्मानुसार प्रचिती मिळत असते
काही वेळा ही प्रचिती उशिरा मिळते अगदी सत्य आहे कारण माणूस म्हणतो मी एवढी चांगली करणे केली पण मला प्रचिती नाही आली
ती प्रचिती चांगली असली तरी कालांतराने मिळते
प्रचिती शब्दाबरोबर वरील ओळ आठवते हे अगदी सत्य आहे
ज्या ठिकाणी दिव्यत्व आहे अलौकिकत्व आहे त्या ठिकाणी आपोआपच हात जोडले जातात ते त्या प्रचितीमुळेच🙏 राम कृष्ण हरी