शिखर

अतीउच्च ठिकाण म्हणजे शिखर, म्हणजे हिमालय. यालाच वैभवाचे शिखर म्हणतात.

चौवीस तीर्थंकरापैकी वीस तीर्थंकरांनी ज्या पवित्र स्थानातून मोक्ष प्राप्ती केली त्याला संमेत शिखर असे संबोधले जाते.

जगातील सर्वज्ञ, ज्ञानी, संतांची योग्यांची परीषद त्याला शिखर परिषद म्हणतात.

ज्या तीर्थंकरांनी परमार्थातील अती उच्च स्थान प्राप्त केले आहे. अशा तिर्थंकराचेसाठी उभे केलेले मंदीर त्याला शिखर बंदी मंदीर म्हणतात.
याप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात अतीउच्च पद मिळवीणे, याला शिखर गाठणे म्हणतात.

असे शिखर एकदम गाठता येत नाही. त्याच्या पायर्‍या पार करत करत आपण शिखराप्रत पोहचतो. एकदम कोणी शिखरावर पोहोचत नाही.

शेर्पा तेनसिंग नावाचा एक जवान हिमालयाच्या शिखर मोहिमेत चाकरी करीत होता. अनेक गिर्यारोहकांना बरोबर घेवून त्याने निरनिराळ्या शिखराप्रत नेले होते. त्याचे मनांत मात्र एकच ध्येय होते ते म्हणजे हिमालयातील अती उच्च शिखर गाठणे.

या ध्येयाने प्रेरीत झालेला शेर्पा रात्रंदिवस या शिखराचा अभ्यास मनात करु लागला. सर्व कौशल्य गाठीशी असताना अनुभवाचे घडे पाठीशी घेऊन त्याने शेवटी हे अतीउच्च शिखर पादाक्रांत केले. तेथे पाय रोवले, भारताचा झेंडा फडकवला. जागतीक किर्तीचा मुकूट त्याचे मस्तकावर विराज मान झाला.

शिखर गाठणे ही कांही गंम्मत नाही. त्यासाठी चौफेर दृष्टी असावी लागते. त्या नजरेने दाखविलेल्या वाटेवर श्रद्धेने चालावे लागते.

ऊन, वारा, पाऊस, बर्फ यांचे तडाख्याला तोंड देत पुढे जावे लागते. तेथे जीवाची पण जमा करायची नसते. डोळ्या समोर फक्त शिखर, शिखर आणि शिखरच दिसत असते. तेव्हा तो शेर्पा तेनसिंग होतो. जागतीक विक्रम घडवून आणतो.

एके काळी अशीच जागतीक शिखर परिषद भरली होती, त्यात जगातील अनेक मोठमोठ्या देशातील उच्च पदस्थ अतिथी उपस्थित झाले होते. त्या परिषदेसाठी भारतातून योगी विवेकानंद यांची निवड झाली. तेथे झालेले योगी विवेकानंदांचे भाषण व त्यांचे व्यक्तीमत्व यामुळे जगातील मोठ्या देशातील लोकांचे डोळे दिपून टाकणारे ठरले. त्या परिषदेत भारताचे नाव उज्वल केले. भारतातील वेद, पुराणे, ग्रंथ किती थोर आहेत या विषयी निरुपण केले.अशी ही ज्ञानवंतांची शिखर परिषद विवेकानंदांनी आपल्या विवेकावर जिंकली.

आपणास पण आयुष्यात ध्येय प्राप्तीसाठी अशी शिखरे गाठावयाची आहेत. त्यासाठी त्या शिखराचे मनन, चिंतन रोज केले पाहिजे. आपला प्रवास, प्रगती कुठपर्यंत आली त्याचा रोज मागोवा घेतला पाहिजे व उर्वरित प्रवासाची आखणी केली पाहिजे.

रोज थोडी थोडी उर्जा घेत घेत आपण इष्ट ध्येयाच्या मंदीराचे शिखरावर पोहोचले पाहिजे. येथे गरज आहे आत्मविश्‍वासाची, जिद्दीची, इच्छा शक्तीची.

प्रपंचात अनेक अडचणी समोर उभ्या रहातात. आपण शरीराने हतबल होतो, पाय उचलत नाहीत हवामान साथ देत नाही, सोबतीला कोणी नाही अशा वेळी शिखर कसे गाठणार. तेव्हा हे शिखर पार करण्यात तुम्हाला मदत करणारा शेर्पा(ध्येय) तुमच्या मनांत ठाण मांडून बसला आहे. त्याची साथ घ्या व प्रपंचातील उच्च शिखरावर पाय रोवा.

तुमचे आयुष्य कामी येईल. तुमचे नांव लोकांचे तोंडी राहिल. जसे परमार्थात म्हटले आहे.

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालीस कळस

त्याप्रमाणे आपणच आपल्या ध्येय मंदीराचा पाया बनायचे आहे व आपणच मंदीराचे शिखर पहावयाचे आहे. यासाठी परमेश्‍वराचे अनुसंधान अखंड नामस्मरण याची नितांत गरज आहे.

आपण रोज नियमाने हे अनुसंधान टिकवले तर नक्की एक दिवस आपण आपल्या ध्येया प्रती पोहोचू यात शंका नाही.

अशा दिव्य शिखराची जेते प्रचिती येते तेथे कर माझे जुळती,

असा प्रयत्न प्रत्येकाने करावा.

1 Comment

  • सौ. शीला केतकर
    Posted October 13, 2022 7:48 pm 0Likes

    खरेच आहे शिखर वाटण्यासाठी माणसाला रोज सराव करावा लागतो.
    आपले ध्येय गाठण्यासाठी माणसाला त्या दृष्टीने रोज अभ्यास करावा लागतो
    तसेच भगवंत प्राप्तीसाठी रोज त्याच्या नामाचे अनुसंधान असावे लागते. बरोबर संदेश आहे
    🙏🙏🙏 राम कृष्ण हरी🙏

Leave a comment