अलंकार, अभुषणे, दागिने, मोल्यवान वस्तु, अंगी अशा अनेक शब्दात या अलंकाराचे वर्णन केले आहे.
जे दागिने, मौल्यवान अभुषणे अंगावर घातले असता ‘रुप पहाता लोचनी सुख आले हो साजनी’ अशी भावना होते, त्याला अलंकार म्हणतात.
हे अलंकार सोन्याचे , चांदीचे, हिर्याचे, माणकाचे, फुलांचे अशा अनके प्रकारचे असतात. याच आलंकारांनी परमेश्वराची सजावट करुन त्याला प्रयत्न करुन त्याची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करीत असतो.
सणावाराला, जन्मदिवसाला हे अलंकार अंगावर चढविले जातात. काहींना या अलंकाराचा गर्व असतो. ते जगाला मी किती श्रीमंत आहे हे या अलंकारातून दाखवित असतात.
आता माणसाची अवस्था कशी असते ते पाहू.
ज्याच्या जवळ सोन्याचे अलंकार आहेत. त्याला वाटते मला हिर्याचे अलंकार कधी मिळतील.
ज्याचे जवळ हिर्याचे अलंकार आहेत, त्याला वाटते मला माणकाचे पाचूचे अलंकार कधी मिळतील.
मात्र जी स्त्री अतिशय गरीब असते, तिला वाटते काळ्या मण्यांची माळ सौभाग्याचे लेणे हाच माझा मोठा अलंकार आहे व या अलंकाराला कसे जपायचे याचा मी आयुष्यभर प्रयत्न करेन.
हिर्या मोत्याच्या, सोन्याच्या अलंकाराला चोरीची भिती असते पण या गरीब स्त्रीला मात्र त्या चोरी -चपाटीची फिकीर नसते.
परमार्थातपण असे मौल्यवान अलंकार परमेश्वराला चढवले जातात.
त्याचा उद्देश असा असतो की एवढे मौल्यवान अलंकार ज्याचे जवळ असून त्या भगवंतानी त्याला मोह सोडला. तो निरिच्छ झाला, तसे तुम्ही प्रपंचात या मोहाला चिटकून राहू नका, निर्मोही व्हा.
तुमच्या मध्ये त्यागाची भावना जागूत करा.
जैन धर्माचे ज्ञान दर्शन चारित्र्य हे तत्व समजाविण्यासाठी अलंकाराचा प्रचार साधू संतांनी केला आहे.
रावणाची प्रिय असणारी सोन्याची लंका एवढी सोन्या चांदीने मढविली होती पण त्याला त्या अलंकाराचा गर्व झाला, तेव्हा मारुतीरायाने सोन्याच्या लंकेचे दहन केले.
तेव्हा आपण अलंकाराला किती महत्व द्यायचे हे ठरवा, निर्मोही बना.