योगी स्वामी विवेकानंद हे राष्ट्रीय संत होउन गेले. त्यांना युगपुरुष म्हणून संबोधले जाते. अशा या योगी पुरुषाचे दर्शन घेण्याचा योग कन्याकुमारीच्या सहलीत लाभला.
अरबी समुद्र व प्रशांत महासागर यांच्या लाटावर उभ्या असलेल्या त्या महान योग्याचा उभा पुतळा जवळ जाऊन पाहिला व मनांत एक नवचैतन्य उभे राहिले.
त्या चैतन्य मूर्तिच्या पायाशी गेल्यावर एक समर्थांचा श्लोक समोर आला तो असा
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघु नायका मागणे हेचि आता ॥
अशा या युग पुरुषाचे चरणी आल्यावर त्यांचे गुरु योगी रामकृष्ण परमहंस यांचे पण स्मरण झाले.
भारता सारख्या विशालकाय देशाची पक्षाघाताच्या झटक्याने लुळीपांगळी झालेली दशा पाहून हा योगी पुरुष पुढे आला. त्यांनी लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केला. (रजो गुणाची वाढ केली) कर्म करण्यास प्रवृत्त केले.
प्रथम ऐहिक जीवन समर्थ करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यामध्ये जागृती कशी उत्पन्न होईल हे पाहिले. त्यांनी या विशालकाय देशाच्या माणसा माणसामध्ये भरलेली अबलकता, ह्रदयामध्ये अनुत्साह व डोळ्यामध्ये ध्येयशून्यता पाहिली.
त्यांना कळवळा आला. अशा या जड झालेल्या भारतीयांमध्ये जागृती निर्माण करणे. त्यांना धक्के देऊन जागे करणे, त्यांच्यात चैतन्य निर्माण करणे हे ध्येय या योगी पुरुषाने समोर ठेवले व प्राण पणाला लावून ध्येयपूर्तीचा वसा घेतला, वेदांचा अभ्यास केला. त्यातुन वेद मंच घेतला. त्या अमोघ मंत्राने त्यांनी सुप्त जनतेला हाक दिला.
उत्तीष्ट, जागृत ही अभयवाणी त्यांची उच्चारली. तुम्हाला जागृत करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. या कार्यात मला मदत करा.
तुम्ही सगळे अनंत शक्तीमान आहात, अमृताचे अधिकारी आहात, असा ध्येयवाद लोकांमध्ये रुजवला व प्रत्येकामध्ये असलेली आत्मशक्ती जागृत केली.