निष्काम कर्मयोग

माणसाचा कर्मयोग सतत चालू असतो. योग म्हणजे क्रिया-कर्म-कृती.

कांही जण योगाभ्यास करतात, त्यामध्ये प्राणायाम. कांही जण ध्यान योग करतात, त्यामध्ये चिंतन-मनन येते.

कांही जण निरनिराळी आसने घालून योग याग करण्याचा प्रयत्न करतात. पण हे सर्व करीत असताना त्या पाठीमागे कांहीतरी अपेक्षा ठेवून हे योग करत असतात.

अशा अपेक्षा दोन प्रकारच्या असतात.

एक शरीर सुदृढ रहावे व दुसरी अपेक्षा मन आनंदी प्रसन्न रहावे.

पण अशा अपेक्षा मनांत ठेवून काही कर्मे करत गेलो व त्याला ताबडतोब यश आले नाही तर मनुष्य नाराज होतो. त्याचा नकारात्मक भाव जागृत होतो. येथे त्याची प्रगती थांबते.

तेथे साधूसंत समजावतात निष्काम कर्म करा, फलाची अपेक्षा ठेवून कर्म केले तर ते कर्म तुम्हाला दु:खच देईल.

तेव्हा योगी साधकाने कर्म करीत असताना अनासक्त होवून कर्म करावे असे सांगितले आहे. प्रत्येक कर्म हे फळ देतेच असते.

पण त्या कर्मातून पुण्यप्रभाव वाढवायचा असेल तर त्या कर्माकडून फळाची अपेक्षा ठेवून कर्म करु नका. जे कर्म कराल ते भगवंताचे आज्ञेने करीत आहे, ही मनाची भावना पक्की करा. त्यातुन मी कर्ता ही भावना नष्ट होईल व तो कर्ता ही भावना प्रगट होईल.

येथे अहंकाराला जागाच उरणार नाही. जेव्हा अहंकार नष्ट होईल, त्यावेळी साधुसंताचा सहवास लाभेल व त्यांची प्रचिती जीवनामध्ये सापडेल.

त्याच वेळी तो साधक संतपदाला जावून पोहोचेल.

तेव्हा प्रपंचात निेष्काम कर्म योग करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा व आयुष्य आनंदी आरोग्यमय करण्याचा प्रयत्न करा.

Leave a comment